पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१०७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झुकणारे. दिवसभर ही मंडळी पत्ते खेळण्यात, सिगारेटी फुकण्यात दंग असे. दुपारी त्यांच्यासाठी घरून डबा येई. डब्याचं झाकण उघडलं तरी मस्सालेदार घमघमाट मिसा राजबंद्यांच्या खोल्यांत जाऊन पोचे. या खास कैद्यांनी राजबंद्यांनीही त्या अन्नाची चव घ्यावी म्हणून आग्रह केला. परंतु तो आग्रह सर्वानीच टाळला. राघव पै सोडले तर बाकीचे चौघेही शाकाहारी होते. ते खास कारण पुढे करणे सोयीचे झाले. हळू हळू श्रीनाथच्या आणि इतरांच्याही त्यांच्याशी गप्पा झडू लागल्या. पुकूर साँखिया जेमतेम पन्नाशीचा असेल. भरपूर वाचन. उत्तम इंग्रजी. त्याचे शिक्षण 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' या जगन्मान्य शिक्षणसंस्थेतून झाले होते. नरेंद्र सारंग जेमतेम सातवी शिकलेला असेल. पण त्याच्या वागण्यातली, इंग्रजी बोलण्यातील इंग्रजी ऐट थक्क करणरी होती. या स्पेशल कॅफेपोसा कैद्यांसाठी सकाळी सहा वाजताच इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराथी दैनिके, साप्ताहिके, पाक्षीके, मासिके येत. संध्याकाळी सायं दैनिकांचा रतिब असे. व्हरांड्यात खुर्च्या टाकून दारू पीत पेपर वाचत बसण्याचा राजेशाही शौक या मंडळींना होता. व्हरांड्याला लगटून उभ्या आडव्या गजांची भक्कम जाळी होती ही बात वेगळी ! पण त्यातून सूर्य किरणे, चंद्रप्रकाश आरामात आत येई. तितक्याच सहजतेने कधी कधी कुजबूज ऐकू येई. 'काल रात्री दीड ते पहाटे पाच पर्यंत सारंग बाहेर होता'. आणि महिन्यातून दोन चारदा हे सारे सहाजण फेरफटका मारून येत. अर्थात पुरावा काय? मग गुपचूप... चुपचुप!!
 दर रविवारी सायंकाळी व्हरांड्यात चौपाटी मांडली जाई. स्पेशल भेळ, पाणीपुरी, रगडा पॅटिस, तऱ्हेतऱ्हेची आईस्क्रीम आणि स्पेशल फालूदा कुल्फी. या चौपाटीत मात्र मिसावाल्यांनी आग्रहाने पाचही राजबंद्यांना सामिल करून घेतले होते.
 श्रीनाथला स्पाँडीलायटिसचा त्रास सुरु झाला होता. पाठीच्या पाचव्या आणि सहाव्या मणक्यातले अंतर वाढले होते. शिवाय डाव्या पायाला सायटिक पेन... जीवघेणी कळ सुरु झाली की वेदना सहन करणे अवघड जाई. दोन तकिये उशाला घेऊन दिवस रात्रभर पुस्तके चावून चावून खाण्याचे हे परिणाम होते. पण त्या पुस्तकांनी दिलेल्या प्रचंड माहितीच्या साठ्यापुढे हा शारीरिक त्रास सहन होई. ट्रॅक्शन, फिजिओथेरेपी सुरु होतेच.

 मुंबईतल्या सेंटजॉर्ज मध्ये आल्यापासून अनेक मित्रांच्या, नातलगांच्या भेटी होऊ लागल्या. अनूचे आजोळ मुंबईचे. मामा, मावशी, आत्या असे अनेकजण मुंबईकर होते. दिवाळीच्या सुट्या सुरु होताच जनक, इराला घेवून अनू गोरेगावाला आली. ती पोचण्याआधी तिची आईही माहेरी आली होती. इथल्या भेटी खूप निवांतपणे होत. बाबाला खूपवेळ भेटायला मिळते म्हणून जनक, ईरा खुश होते.


शोध अकराव्या दिशेचा / १०७