पान:व्यवस्थापनाची मूलतत्त्वे (Vyavasthapanachi Multatve).pdf/१०४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
११४
व्यवस्थापनाची मूलतत्त्वे
 

खूपशी माहिती जमविली असली तरीही निर्णयशक्ती हीच निर्णायक बाब ठरते. उपक्रमशील निर्णय निर्णयशक्तीवर भरंवसा ठेवावा लागतो.

 व्यवस्थापनाची ही एक विसंगती आहे की निर्णय जितका महत्त्वाचा, तितकी मोठी निर्णयशक्तीची भूमिका असते. त्यामुळे माहिती आणि निर्णयशक्ती निर्णय घेण्यासाठी कसे वापरले जातात हे पाहणे जरुरीचे आहे. जेव्हा व्यवस्थापक माहिती जमवितो तेव्हा तो त्याच्या ज्ञानाच्या आधारे 'तर्कशास्त्रा'च्या आधारे त्याचे विश्लेषण करतो. ‘तर्कशास्त्र' या ज्ञानशाखेविषयी आपण आज खूप काही जाणतो; कारण कॉम्प्युटर त्याच प्रकारे काम करतात. याचा परिणाम म्हणून विश्लेषणाचे सामर्थ्य व्यवस्थित वापरले जात असल्याची आपण खात्री करू शकतो. अनेक प्रकारची व्यवस्थापन तंत्रे उपलब्ध करण्यात आली आहेत. ही तंत्रे म्हणजे खरं तर तर्कशास्त्राचा विकास करण्याचा प्रकार आहे.


अंतर्ज्ञानाचा उपयोग

मात्र, जेव्हा आपण एखाद्या निवाड्याच्या विश्लेषणाकडे येतो तेव्हा आपल्यासमोर एक समस्या असते. मानवी मेंदूत दोन केंद्रे असतात. डावीकडचे केंद्र बुद्धिमत्तेचं, बुद्धिमापन तर्काचे, विश्लेषणाचे सामर्थ्य याचे नियंत्रण करते. उजवीकडील केंद्र सर्जनशीलता, अंतर्ज्ञान, आणि कल्पनाशक्ती यांचे नियंत्रण करते. काही गोष्टी अशा असतात की त्याविषयीचे आपले ज्ञान तसे मर्यादित असते. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी व्यवस्थापक आवश्यकरीत्या जी निर्णयशक्ती वापरतो ती या केंद्रातून-अंतर्ज्ञानातून येते. अंतर्ज्ञान ही निर्णय घेण्यातील तर्काधिष्ठित असणारी बाब नसून जितके महत्त्वाचे निर्णय घेतले जातात तितके या अंतर्ज्ञानाला अधिकाधिक महत्त्व येते. व्यावसायिक व्यवस्थापकांना व्यवस्थापन तंत्रांचे शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यात आलेले असते. तर्काचा उपयोग ते उत्तमरीत्या करतात. कोणती माहिती जमवावीच लागेल हे त्यांना चटका कळते. कोणते तर्कशास्त्र वापरावे आणि तर्काधिष्ठित निष्कर्षाप्रत यावे हे त्यांना चटकन कळते. पण जेथे निर्णयशक्तीचा उपयोग करणे भाग असते, तेथे नेहमी समस्या असते. या ठिकाणी काही वेळा उद्योगकुटुंबांतून आलेले व्यवस्थापक व्यावसायिक व्यवस्थापकांपेक्षा वरचढ आढळतात; कारण ते अशा काही वातावरणात वाढलेले असतात की जेथे अंतर्ज्ञानाचा वापर केला जात असताना ते पाहतात. बुद्धिमत्ता जशी वाढविता येत नाही, तसेच अंतर्ज्ञानही वाढविता येत नाही. पण लोक अधिक परिणामकारकरीत्या वापरू शकतील अशा अर्थाने अंतर्ज्ञानाचा विकास करणे शक्य असते. बुद्धिमापन करताना विद्यार्थ्याची, या ना त्या प्रकारची बुद्धिमत्ता चाचणी घेतली जाते. या चाचण्या देण्याने अशा चाचण्या सोडविण्याचे