पान:महमद पैगंबर.djvu/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्विराष्ट्रबादाचे खंडन १४ लक्षात घेऊन प्रांतरचना झाली व प्रांतांची संख्या आजच्याहून कमी झाली तर, एकाद्या प्रांतांत मुसलमानांचा धार्मिक गट कदाचित् बहुसंख्य राहील इतर सर्व प्रांतांत तो अल्पसंख्य राहील. सबंध देशाचा व त्या देशाच्या अध्यर्वात सरकारचा विचार करतांना मुसलमान फार तर अल्पसंख्य वर्ग (Minority) ठरतील. फक्त धामक बाबतींत ते हिंदू हून भिन्न आहेत. घामक गोष्टींच्या संरक्षणाची योजना प्रांतांतच पूर्णपणे होण्यासारखी असल्यामुळे, अखिल भारताच्या कारभारांत व व्यवस्थेत मुसलमानांचे भिन्नपण मान्य करण्याचे कारणच नाहीं. : एकत्र नांदण्याची मुसलमानांची इच्छा नाहीं, जबरदस्तीने एकत्र नांदावें लागत असल्यामुळे ते कटकटी करतात, अशा स्थितींत वेळीच त्यांचे भिन्नपण मान्य करावे व स्वतंत्र राष्ट्र म्हणून त्यांना वेगळा संसार थाटू द्यावा अशा आशयाचाहि कोटिक्रम डॉ. आंबेडकरांनी केला आहे. या कोटिक्रमामागे अनेक गोष्टी उभ्या आहेत. त्यांतल्या कांहीं हिंदुहिताच्या आहेत असे डॉ० आंबेडकरांचे मत आहे. त्यांचा विचार मागाहून करण्याचे ठरवून तूर्त एकाच मुद्याचा विचार करू. एकत्र नांदण्याची व भिन्नपणे नांदण्याची इच्छा (will) हा मुद्दा मोठा मजेचा आहे. लखनौ करारापासून ज्या. सगळ्या...योजना हिंदू कडून स्वीकारण्यांत आल्या अगर हिंदूंवर लादण्यांत आल्या त्यांमध्ये अखंड देशाची कल्पना साक्षात् गोंविलेली आहे. हे विसरून, मुसलमानांच्या इच्छेपुढे दबून, पाकिस्तान' म्हणून देशाच्या एका भागावर हिंदूंनीं तुळशीपत्र ठेवावयाचे तर हळुहळू त्यांना दक्षिणभागांत एकाद्या खिस्ती-स्तानाचीहि जागा खाली करून । द्यावी लागेल ! . कारण, कोचीन, त्रावणकोर वगैरे भागांत आजच खिस्ती लोकसंख्या बेसुमार आहे व ख्रिस्ती लोकसंख्येचे प्रमाण त्या भागांत झपाट्याने वाढत आहे. हा प्रकार असाच चालला तर कोणाची मजल कोठवर जाईल याचा लेमच नाहीं. इच्छेचे हैं अडाणी माप रूढ झाले तर, अँग्लोइंडियन व डोमिसाइल्ड युरोपियन हेहि हिंदुस्थानांत एका 'नॅशनल होम' मागू लागतील! गोलमेज परिषदेच्या वेळीं यांतल्या कांहीं बृहस्पतींच्या मनांत अशी कांहीं