( ता० ३ जून इ० सन १७५२) मानाजीरावानें त्याचा वध करून त्याचें
डोकें महंमदअल्लीकडे नजर पाठविले. व अशा दुःखद रीतीनें चंदासाहेबाचा
अंत होऊन कर्नाटकच्या राजकीय रंगभूमीवरील एक अत्यंत महत्त्वाचा अंक
समाप्त झाला.
चंदासाहेबाबरोबर चाललेल्या युद्धांत, महंमदअल्ली हा विजयी झाल्या-
नंतर या युद्धांमध्ये प्रतापसिंहानें आपणांस साह्य केले म्हणून बक्षिसादाखल
त्याने तंजावरची दहा वर्षांची खंडणो माफ केली आणि कोइलाडी व यलंगाडू
हे दोन तालुके त्यानें प्रतापसिंहास जहागीर दिले. त्रिचनापल्ली येथील युद्धां-
मध्ये म्हैसूरकर नंदराज दलवाई, गुत्तीकर मुरारराव घोरपडे व इंग्रज यांनीं
महंमदअल्लीस उत्तम मदत करून समरांगणावर चांगली कामगिरी बजाविली
होती, त्यामुळे त्यांपैकी दलवाई व घोरपडे यांनी एकत्र होऊन त्रिचनापल्ली
व श्रीरंगम् आपल्या ताब्यात द्यावें, म्हणून महंमदअल्लीकडे मागणी केली.
परंतु महंमदअल्ली याने त्यांच्या मागणीची टाळाटाळ केल्यामुळे, ते उभयतांही
त्रिचनापल्लीच्या पश्चिमेस तळ देऊन तेथे राहिले. व गुप्तरांतीने फ्रेंचार्शी कार-
स्थाने करून महमदअल्ली व त्याचे साह्यकारी तंजावरकर यांच्याशी युद्ध कार-
ण्याचा व त्रिचनापल्ली हस्तगत करून घेण्याचा त्यांनी मनसुवा केला. तथापि
तंजावरकर प्रतापसिंह वळल्यास त्याला फोडून एकट्या महंमदअल्लीसच पहि-
ल्यानें झोडावा, अशा इच्छेने त्यांनी प्रयत्न आरंभिला. प्रतापसिंहास अनुकूल
करून घेण्यासाठी धाकदपटशा व लांचलुचपत हे दोन्हीही प्रयोग त्याच्यावर
केले. "तुझा सेनापति मानाजीराव याने आमचा दोस्त चंदासाहेब याचा वध
केला आहे, त्याचा सूड उगविन्याशिवाय आम्ही राहणार नाहीं, व तुम्हीं
आमच्या शत्रूस ( महंमदअल्लोस) यापुढे जर मदत केलीत, तर तुमचा मुलूख
उध्वस्त केल्याशिवाय आम्ही सोडणार नाहीं." असा निर्वाणांचा निरोप त्यास
पाठविला. त्यामुळे प्रतापसिंह अगदी घाबरून गेला. शिवाय प्रतापसिंहाचा
दिवाण सखोजी नाईक व सेनापति मानाजीराव यांचे वांकडें होतें. या गोष्टीचा
फायदा घेऊन त्यांनी सखोजीस अंतस्थ रीतीनें लांच देऊन आपल्या बाजूस
अनुकूल करून घेतलें, व त्याच्या मार्फत प्रतापसिंहाचें मन वळवून मानाजी.
रावास सरखेळ पदावरून दूर करविलें. थोडक्यांत म्हणजे तंजावरचा दिवाण