सबब समाजाला दैन्य आलें, व तें भोगिन्याखेरीज गत्यनर नाही, असें
रडगाणे गाऊन स्वस्थ बसणारे ऐदी किती तरी होते. "विठोवा सर्व काही
योग्य वेळी नीट करील, त्याला जनतेची काळजी आहे;" असे समाधान करून
घेणारे भक्तिमागी तर असंख्य होते. मुसलमानी पेहराव, मुसलमानी चाली.
रिती, मुसलमानी भषा, व मुसलमानी धर्म स्वीकारून
समाजाच्या यातना बंद करूं पाहणारे किती तरी हिंदू प्रांतोप्रांतों पर होऊन
बसले होते. यवनावर रुसून, त्यांच्याशी व्यवहार बंद करून, त्यांचे मुखा
वलोकन न करणारी दासोपंतादिक मंडळीही आपल्याकडून यवनांच्या पारिप-
त्याचे प्रयत्न करीतच होती. यवनसेवा करून जनतेचा परामर्ष घेऊं पाहणार
दामाजीपंतही+ अनेक होऊन गेले, यवनाविरुक्त बंड करून स्वराज्य मिळ-
वयाच्या सोळाव्या वर्षी उपरति होऊन तो रामभक्त बनला. त्यानें “योग
संग्राम " या नावाचा एक वेदांतविषयक ग्रंथ इ० सन १६६४ मध्यें
लिहिला; व या शिवाय, वेदोत विषयावरील त्याचे आणखीही कित्येक ग्रंथ
आहेत. शेख महंमदाचे अनुयायी हिंदू प्रमाणे वागतात; परंतु ते मुसल-
मानाशी शरीरसंबंध ठेवितात.
* दासोपंत (जन्म इ० सन १५७८; मृत्यू इ० सन १६१५ ) हा बहा
मनी राज्याच्या काळांत एक प्रसिद्ध साधु पुरुष व कवी होऊन गेला. त्याचा
बाप बहामनी राज्यांत नौकशंस होता; व सेवेत अंतर पडल्यामुळे दास्रो-
पंतास ओलांस ठेवून तो बेदर येथून परत आला होता. दासोपंत हा महान्
दत्तभक्त होता, तो बेदर येथे प्रतिबंधांत असतो त्यास तेथील लोकांनी मुल.
मान करण्याचे ठरविले; तेव्हा त्याने श्रीगुरू दत्त त्रयाचा धांवा केल्यावर
दत्ताने त्याचा सुटका केली. दासोपंताचा ग्रंथसंग्रह अतीशयच मोठा आहे.
व सवालाख पदार्णव, व सवा लाख गीतार्णव, एवढा त्याचा ग्रंथसमूह मरा-
ठीत असून तितकाच संस्कृतातही आहे दासोपंत हा जोगाईचे आंबें तेथें
इ० सन १६१५ मध्ये मृत्यू पावला; त्या ठिकाणी त्याची समाधी व मठ आहे.
+ दामाजीपंत ( इ० सन १४७५) दा बहामनी राज्याच्या काळांत
एक मोठा भगवद्भक्त होऊग गेला, तो मंगळवेढे येथे कारभारावर असत