मान्य केल्या नाहीत; तेव्हां शहाजहान यानें आपल्या सैन्याचे चार भाग
करून त्यांतील दोघांची विजापूरकरावर व दोघांची शहाजीवर रवानगी केली;
त्यावेळी खान डौरान यांस त्याच्या मदतीस आणखी एक सरदार देऊन
बिजापूरकरावर पाठविलें; आणि शहाजीवर पाठविलेल्या सैन्यापैकी एका भागा-
वर शाइस्तेखानाची नेमणूक केली; व त्यास शहाजीच्या ताब्यांतील चांदवड,
नाशीक व संगमनेरकडील सर्व प्रदेश व किल्ले हस्तगत करून घेण्याची काम-
गिरी सोंपविली; व दुसऱ्या भागावर खान जमान यांस नेमून शहाजीस दक्षिणें-
तील मैदान प्रदेशांतून हाकलून त्याचा पाठलाग करण्याची व त्याच्या ताब्यांतील
कोंकणपट्टोंतील प्रदेश व किल्ले हस्तगत करून घेण्याची कामगिरी सांगितली.
खान डौरान विजापूरकरावर चाल करून निघाल्यावर मार्गात भोसल्यांच्या
मूळ वस्तीच्या गांवापैकी चांभारगोंदें उर्फ श्रीगोंदें X वगैरे गावें त्यानें लुटिलों;
व शहाजीची बातमी ठेवून तो पारगांवकडे + आला. त्याठिकाणी त्याची व
शहाजांची गांठ पडली; तथापि शहाजीनें सतत तीन महिने त्यास घुलकावण्या
दाखविल्या; व अतीशय त्रासवून सोडिलें. इतक्यांत, " विजापूरकर मोंगलाश
तह करण्याच्या वाटाघाटीत आहेत; " असें त्यास कळले; तेव्हां तो तसाच
पश्चिमेकडे वळला;तोच खान जमान त्याच्या पाठीवर येऊन थडकला; व
त्याने शहाजीस भीमापार पुण्यापर्यंत घालवांत नेले. नंतर शहाजीनें लोह-
X श्रीगोंदे हे तालुक्याचें गांव, दौंड मनमाड रेलवेवरील पिपरी स्टेशन
पासून अजमार्से सात मैलांवर व अहंमदनगरपासून अजमासें बत्तीस मैलांवर
दक्षिणेस आहे.
+पारगांव ऊर्फ पेडगांव, हें श्रीगोंदें तालुक्यांत असून श्रीगोंदें व पारगांव
ह्रीं दोन्हीं गांवें सरस्वती नदीच्या कांठी आहेत; ही नदी कोथूळ जवळच्या
डोंगरांत उगम पावून, तेथून दक्षिणेकडे वहात जाऊन पारगावाजवळ भीमा
नदीस मिळते; म्हणजे पारगांव हैं ठिकाण सरस्वती व भिमा या दोन नद्यांच्या
संगमावर आहे. पारगांव येथे बहादूरगड ह्या नांवाचा एक भुईकोट किल्ला
आहे; व पूर्वकाळ हे महत्त्वाचें ठाणे म्हणून गणले गेलेले असून पेशव्यांच्या
वेळी ह्या ठिकाणी परगण्याची कचेरी होती, असा उल्लेख आढळून येत आहे.