हा समारंभ आटोपल्यावर ते उभयतां दौलताबादेवर चाल करून येण्यास
निघाले;त्यावेळी मार्गात कोरेगांवनजीक भिमा व इंद्रायणी या नद्यांच्या संगमाव-
रील नागरगांव ऊर्फ तुळापूर मुक्कामी ता. २३ सप्टेंबर इ. सन १६३३ रोजों,
( शके १५५५, श्रीमुखनाम संवत्सर, भाद्रपद महिना, अमावास्या, सोमवार
रोजी अकरा घटकेस ) सूर्यग्रहण पडलें; ही सूर्यग्रहणपर्वणी साधून मुरार-
पंतानें सांग व साभरण गजदान, अश्वदान, व गोशतदान केलें; आणि सुवर्ण-
रजतादि चोवीस तुळादानें दिली. शिवाय सबंध तुळापूर गांव सोळा ब्राम्हणांस-
१ सोनभट देवगिरिस्थ, २ नरसिंहभट अग्निहोत्री, ३ त्र्यंबकट नांदुर-
कर, ४ त्र्यंबकभट सुदामे, ५ त्र्यंबकट खेडकर, ६ भानभट तळेगांवकर,
७ महादेवभट पुरंदरे, ८ त्र्यंबकभट पुराणीक, ९ पुरुषोत्तमभट वैष्णव,
१० भानमट वैष्णव, ११ गोपतिभट ढेरे, १२ आपदेव चित्राव, १३
बाळपाठक नाशिककर, १४ रंगनाथभट प्रामज्योतिषी, १५ सोमनाथभट
प्रामज्योतिषी, १६ पुंडलीक हरिदास पंढरपूरकर ह्या सोळा ब्राम्हणांस
अप्रहार दिला; व त्याबद्दल विजापूरकर आदिलशाहाची पत्रे करून दिली.
अग्रहार देण्याची अट अशी आहे कीं, दात्यानें देयांना सालंकृत घरें बांधून
देऊन खेरीज झालों नसतील त्यांची लग्ने करून द्यावीं; त्याप्रमाणें गौड
नांवाच्या कारागिराकडून ब्राम्हणांना त्याने सोळा घरें बांधून दिली. या व्यति-
रिक्त कालिदास या नांवाच्या कवीला, वरुरचि या नांवाच्या विद्वानाला,
त्रिमलभट या नांवाच्या स्वपुरोहिताला, व रायाराय या आडनांवाच्या ब्राम्ह
णाला त्यानें भूमिदानें दिलीं; व पुष्कळच इतरही दानधर्म केला; यावेळी
हत्तीची रौप्य तुला करून तें रुपें ब्राम्हणांना दान करावें, असा मुरारपंतानें
विचार केला; परंतु हत्तीची तुला कशी करावयाची, याविषयी कोणासही
युक्ति सुचेना. त्यावेळी शहाजीनें मुरारपंतास सुचविले की, हत्तीस होडींत
चढवावें, आणि त्याच्या भारानें ती ज्या मर्यादेपर्यंत पाण्यांत बुडेल, त्या
ठिकाणी खूण खरावी; नंतर इत्तोस होर्डीतून खाली काढून तीत पुन्हां दगड
भरावे; व केलेल्या खुणेपर्यंत ती पाण्यांत बुडाली म्हणजे ते सर्व दगड
घेऊन त्यांचे वजन करावें, म्हणजे हत्तीचें बरोबर वजन कळेल. त्या•
काढून
७
पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१०८
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९७)