१६२ भाषाशास्त्र.
धेनु बलात्कारानें नेली, व मोठा अनाचार मांडला. त्यामुळें, त्याचा प्रतिकार करण्यासाठीं तिनें तत्काल मोठा हंबरडा फोडून, पल्हव, शक, यवन, कांबोज, बर्बर, इत्यादि नानाविध प्रबल प्रजा उत्पन्न केली, आणि विश्र्वामित्राच्या सैन्यास जेरीस आणिलें.
तस्याहुंकारतोजाताः कांबोजा रविसंनिभाः ।
ऊधसश्र्चाथ संभूता बर्बराः शस्त्रपाणयः ॥ २ ॥ ( रामायण. बालकांड. सर्ग ४५ )
ह्या, व या खाली नमुद केलेल्या कथाभागावरून, आणि पूर्वीं सांगितलेल्या प्रमाणांवरून, शक, यवन, चीनी, म्लेच्छ, इत्यादि लोक भरतखंडांतच उत्पन्न होऊन, सर्वत्र पसरल्याचें अनुमान होतें. आतां, अनार्य व दस्यु लोक, आणि अन्ध्र, पुण्ड्र,
बर्बर, पुलिन्द, मूतिब, वगैरे दूर दूरच्या उपान्तवर्ती व नानाविधजाती, कशा आणि कोणत्या कारणाने झाल्या, या विषयींचे
ऐतरेय ब्राम्हणांतलें, व
एक चमत्कारिक कथानक ऐतरेय ब्राह्मणांत¹ देखील आहे. त्यावरून, असे स्पष्ट दिसून येते की, सदरहू
पर्यंतवर्ती जाती विश्र्वामित्रापासूनच उत्पन्न झाल्या. कारण, ह्याचे पन्नास पुत्र असून, ते आज्ञोल्लंघन करणारे निघाले. सबब, त्याने त्यांचा धि:कार केला, व असा शाप दिला कीं, तुमची प्रजा प्रान्तनिवासी होऊन, सरहद्दीवरील
फार लांबलांबच्या आणि जंगली प्रदेशांत
श्रुतींतलें
राहील. पुढे हीच प्रजा अन्ध्र,
¹ ऐतरेय ब्राह्मण ऋग्वेदाचे होत. सबब. त्यावरून त्यांचे प्राचीनत्व सहजीं ध्यानांत येईल.