Jump to content

पान:बाळमित्र भाग २.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जळती घरे. घरांत पाणी आणावयास धांवती.) सटव्या- (परशुरामाचे तोंडाकडे लवून पाहतो.) नाहीं नाहीं, अझून कांहीं मेला नाहीं; नाका तों. डा वाटे वारा येतो हा; हा जर मेला तर मी वि- हिरीत उडी घालीन (मोठ्याने ओरडून.) अहो परसराम, अहो परसराम, सुधीवर आणावयाचा मला येखादा उपाव ठावा असता, तर लई चांगले होते. ( परशुरामाचे तोंडावर आपल्या तोंडाने गार वारा फुकितो.) हे फुकणे मला लई मोठे दुःखाचे डोंगरा सारखें झालें, म्यां खबर सांगितली ह्मणून असें झालें, मी वाईट खरा, पण ह्याला म्यां घाबरें होऊ नका असे सांगितले असतां ह्यांनी डोळे पांढरे केले, ही ह्यांची चक. म्यां अगोदरच फोडून सांगितले होते, पण परसरामजी तुझी ऐकिलें ना. ही. माझी बायको मेली तव्हां मलाही दुख लई झाले होते, तव्हां जर म्यां असें करून प्राण या- कला असता तर मग मला लोक वेडा ह्मणते. प- रसराम, आतां मी कोणची गत करूं! हे मुन्धी वर येतील असे मला दिसत नाही. (इकडे ति. कडे पाहतो.) अहा! ती तिठे विहीर आहे, ते. ठून तरी पाणी आणावें, ते तोंडावर टाकले झणजे लौकर उठतील. ( इतक्यांत राजाराम कुटुंबा सु. ध्धांयेतो. (त्यास पाहून सटव्या पळून जातो.) दे- वकरो की माझा धनी परसरामाला असें न पाहो.