पान:बालहक्क (Balhakk).pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 वर्षाताईंनी मुद्देसुद मांडणी केली, चर्चा केली, सर्वानुमते बालविवाहाला विरोध करणे, मुलींना बालकामगार म्हणुन उसतोडीला जाऊ न देणे, बालकाच्या हंगामी वस्तीशाळांची पाहणी करणे, तेथे त्यांना योग्य आहार देतात की नाही याची माहिती घेणे तसेच काही आशाताईंना मुलींना शाळेत जायला यायला एस.टी ची व्यवस्था व रस्ता नीट करण्याविषयी संबंधीत अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात असेही मत व्यक्त केले. सिंधुताईंनी (आशा) शाळेमधील बाथरूम, पाणी व्यवस्था नाही याचाही बंदोबस्त व्हावा अशी मागणी केली.

 हळुहळु मिटींगची वेळ संपत आली. हळुहळु आशाताई जाऊ लागल्या. सर्व आशा गेल्या पण सारिका शांत बसुन होती. ऐरवी संध्याकाळी गावाकडे जायची गडबड करणारी सारिकाला अस्वस्थ असल्याचे कारण विचारले आणि एखादा बांधफुटावा तशी सारिकाच्या डोळ्यात पाणी वाहू लागले. वर्षाताईंनी विचारपूस केली धीर दिला व कारण विचारले तसे सारिका मनातली पाने वाचू लागली.

 ‘आमच्या गावापासून जवळच आश्रमशाळा आहे. त्या आश्रमशाळेत ऊसतोड कामगारांची मुले असतात. मुले-मुली असतात. त्या शाळेत एक शिक्षक आहेत. सारिका एकदम गप्प झाली शांत झाली आणि पुन्हा बोलू लागली. आश्रमशाळा मुलींच्या सुरक्षेसाठी असते ना? ताईंनी 'हो असती' म्हणाल्या, 'मग शिक्षकच मुलींशी वेगळ वागायला लागले तर?' ताईंनी सारिकाच्या पाठीवर हात ठेवत म्हणाल्या सारिका अन्याय करणारा जेवढा दोषी तेवढा सहन करणारा पण दोषी त्याहून चाललेला प्रकार बघणारा दोषी. सारिकाला जरा धीर मिळाला.

 ती पुढची कहाणी सांगु लागली, "त्या शाळेतल्या मुली माझ्या कडे शिकवणीला येतात त्यांना मी मोफत शिकवते.आश्रमशाळेतील एक शिक्षक रोज सकाळी मुलींना अंघोळ घालतो, कपडे काढायला लावतो आणि स्वतः अंघोळ घालतो.सारिकाच्या डोळ्यातून पाणी वाहत होते व तोंडातून शिव्या, शाप."

२८