पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/177

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मोठ्या भूमिका घेतात. हे लेखकाचं लेखकराव' बनणं नेमाडेंपेक्षा वेगळं आहे.

 ‘शाळेच्या आठवणी' लेखकाचं स्मरणरंजन आहे. अलीकडे वर्गातील विद्यार्थी कालांतराने भेटतात. जुन्या आठवणींना उजाळा देत जुनं गमावल्याचं दुःख व्यक्त करत भविष्यासाठी काही करू मागतात, पाहतात - हे। समाजाचं सकारात्मक रूप रचनात्मक आहे. समाज श्रीमंत पैशांनी नाही। होत. जाणिवा त्याला समृद्ध, प्रगल्भ करत असतात हे या लेखनातून कळतं. त्याची बाजू' या संग्रहातील वेगळा लेख होय. तो लिहिण्याची धाटणी वेगळी. विचारही आगळा. आत्मविश्वासाचं बळ वृद्धिंगत करणारा हा लेख अनेक हात सरसावत स्वप्नांचं महत्त्व अधोरेखित करतो. घर असावे घरासारखे' म्हणणं नि असणं वेगळं. घर सोय की गैरसोय हे सापेक्ष असतं. 'घर वडाच्या झाडासारखे असावे' हा लेखकाचा भाबडेपणा आहे. पारंब्या वाढतात. जमिनीत रुजतात. नव्या पारंब्या अंकुरतात. हे वास्तव कसं विसरून चालेल? ‘साधनेतून पूर्ततेकडे' वैचारिक लेखन आहे. 'शिक्षण' याच पठडीतले. तशी या पुस्तकात ललित व फलिताची सरमिसळ आहे. ‘आभासी जग' एकविसाव्या शतकाला स्पर्श करणारा लेख. त्याचा विषय अत्याधुनिक आहे. ‘आदर्शाच्या शोधात' मध्ये लेखकातला शिक्षक डोकावतो. हे सर्व वाचत असताना लक्षात येतं की हे पुस्तक ललित आहे. पण त्यापेक्षा ते अधिक मूल्यप्रवण व संस्कारी आहे.

 ‘चंद्रप्रकाशाच्या झळा'चं वाचन मनस्वी आनंद देतं. पण त्यापेक्षा अधिक आपणास जीवनबोध देतं. माणूस, जीवन, साहित्य, निसर्ग, कल्पना, वास्तव, भावतरंग, स्मरणरंजन असं वैविध्यपूर्ण भाव, रस देणारं हे लेखन. लेखक या उसन्या शब्दकळांमागे धावत नाही. कल्पनांची उत्तुंग भरारीपण यात नाही. आहे एखाद्या पाणबुड्याची जीवन सागराचा तळ शोधणारी तळमळ, धडपण! साहित्याचं मोल सौंदर्यापेक्षा उपयुक्ततेकडे सरकण्याच्या आजच्या काळात माणसं गुंड्याभराच्या आपल्या स्वर्गाद्यानात गुलाब लावण्यापेक्षा नारळ लावणं एवढ्याचसाठी पसंत करतात की ते सावली सोडता सर्व देतं. गुलाबाचा सुगंध व सौंदर्य पहिल्या चहाबरोबरच्या वृत्तपत्रांइतकाच! त्याला शेक्सपिअरचं अभिजातपण यायचं तर उपयोगितेला मूल्यांचा स्पर्श हवा. तो स्पर्श हे लेखन देतं.

 युवराज पाटील नवोदित लेखक आहेत. त्यांचं हे पुस्तक त्यांच्या प्रतिभेची पहिली चंद्रकला होय. चंद्रकलेचं सौंदर्य तिच्या अपूर्णतेतच असतं. तिच्या कृश कलेवराची कलात्मकता पूर्ण चंद्रात नसते. ‘दूज का

प्रशस्ती/१७६