पान:पाकिस्तानचे संकट.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खोटी कल्पना व तिचे खंडण was broken by the Maharattas. The Power of the Mabarattas was broken by the Afgans and while all were struggling against all, the Britain rushed in and was enabled to subdue them all.* (बडया मोगल बादशाहांची सार्वभौम सत्ता त्यांच्याच सुभेदारांनी खिळखिळी केली. मराठ्यांनी या सुभेदारांना नरम केलें आणि अफगाणांनी मराठ्यांच्या सत्तेवर आघात केला. अशा रीतीने सर्वच जण इतर सर्वांशी झगडत असतांना, ब्रिटिश लोक आंत घुसले आणि त्या सर्वांनाच जिंकणे त्यांना शक्य झालें.) मार्सला १८५३ साली कळलेली ही गोष्ट Confederacy of India या पुस्तकाचा लेखक A Punjabi. याला १९३८ सालींहि कळली नाही. कारण आपल्या अद्भुत पुस्तकाच्या पृ० १३८ वर त्याने पुढील तारे तोड़न ठेविले आहेतः As the English had won their Empire from the Muslims, they trusted the Hindus in preference to them ! (इंग्रजांनी साम्राज्य मिळविलें तें मुसलमानांना जिंकून मिळविलें! म्हणन इंग्रज मुसलमानांच्या मानाने हिंदूंवर अधिक विश्वास ठेवू लागले !) इंग्रज भरतखंडाच्या साम्राज्यसत्तेचे स्वामी झाले ते कसे इतकाच प्रश्न तूर्त विचारांत घ्यावयाचा असल्यामुळे, सोळाव्या शतकांत व तत्पूर्वी पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रज या बुभुक्षितांनी हिंदुस्थानांत कोणकोणत्या कलागती केल्या या मुद्याकडे वळण्याचे कारण नाही. बाबरापासून सुरू झालेल्या मोगल घराण्याच्या अंमलापूर्वी जवळ जवळ तीनचारशे वर्षे मुसलमानांच्या टोळधाडी हिंदुस्थानाला उपद्रव देऊ लागल्या होत्या. हे खरे असले तरी, हिंदुस्थानसारख्या खंडप्राय देशाची एकमुखी सत्ता मुसलमानांच्या हातांत त्या समयाला तरी गेली नव्हती, हे सुस्पष्ट आहे. चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत काश्मीरांत सेनदेव राजा राज्य करीत होता. सेनदेवाच्या मृत्यूनंतर त्याचा मुसलमान प्रधान शहा मीर याने काश्मीरचे राज्य बळकाविलें हें खरें: पण आपलें मुसलमानपण हिंदुप्रजेला तापदायक होऊ नये याबद्दल त्याला फार दक्षता बाळगावी लागत होती. राजस्थानातील राणा संग, उदयसिंह

  • Karl Marx, Letters on India, p. 55.