सभा उभळून लावावी असा उद्देश असेलसें दिसत नाहीं. 'मी सभा मोडली' असे टिळकांनी लिहून दिले तर आपण ऐक्याला- समेटाला तयार आहों, असें राष्ट्रीय पक्षास कळविण्यांत आलें, तेव्हां टिळकांनी स्वतःच्या शिरावर राष्ट्रकार्याकरितां ही जोखम घेतली, आणि सुरेंद्रनाथ, अश्विनीबाबु जवळ तसा लेखी कबुलीजबाब दिला. परंतु त्यांची कोणीं गांठही घेतली नाहीं असें मोतीलाल बाबू 'Step in the steamer' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत सांगतात. नाना मतांच्या गलबल्यांत सत्य शोधून काढणे फार कठिण आहे, परंतु टिळकांसारखा माणूस केवळ सभा उधळून लावण्यासाठीं आलेला नसावा असें वाटतें. बंगालमधून 'Blow up' अशी आलेली तार वाचून पुष्कळजण तारे तोडतात. परंतु यावरून कांहीं टिळकांवर आरोप शाबीत होत नाहीं. बंगाल्यांमधील नवीन रक्ताचे- नवीन दमाचे लोक टिळकांच्याही पुढे गेले होते. टिळक स्पष्टपणे सांगत कीं, आपणांस साम्राज्यांत रहावयाचें आहे; येथे प्रयत्न करून इंग्लंडमध्येही शिष्टमंडळे पाठविली पाहिजेत; यश येण्यास केव्हांही वेळ लागणारच. नवीन क्रांतिकारकांचा विचार सभा उधळून लावण्याचा असेल. आणि टिळक त्यांस पूज्य वाटत असल्यामुळे त्यांचे विचार टिळकांवरही पुष्कळ लोक लादूं पाहतात, परंतु 'शिष्यापराधे गुरोर्दंडः' असा हा प्रकार होय.
येवढे मात्र खरें कीं, टिळकांस काँग्रेसची गोगलगायी पद्धत पसंत नव्हती. चार दिवस जमून नुसते ठराव पास करून जावें आणि मग बॅरिस्टऱ्या, वकिल्या कराव्या याचा त्यांना तिटकारा येई. काँग्रेसच्या कामाचे लोण सर्व लोकांत जर पसरविलें असेल तर तें टिळकांसारख्यांनींच. त्यांनींच व्याख्यानांनीं व लेखांनी देशांत काय चाललें आहे याची लोकांस जाणीव करून दिली. अशा मनुष्याला काँग्रेसभंजक कसें म्हणावयाचें? काँग्रेसला लोक येतात, आरती करितात आणि घरोघर जातात याविषयी काँग्रेसचे जनक ह्यूमसाहेब काय म्हणतात ते पहा :- "You meet in congress, you glow with a momentary enthusiasm. You speak much and eloquently. But the congress closes and every man of you goes off straight way on his private business. Years ago, I called on you to be up and
पान:ना. गोखले चरित्र.pdf/१९६
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६४
राष्ट्रीय सभा मोडण्याची जबाबदारी कोणावर !
