Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२८
स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण.

flames of hatred towards the British Rule in India, he only used kerosine for that purpose." टिळक व पाल यांनीं राष्ट्रीय पक्षाची बैठक भरवून या काँग्रेसमध्यें स्वदेशी, बहिष्कार, व राष्ट्रीय शिक्षण हे तीन ठराव पसार करून घ्यावयाचें ठरविलें. यांपैकी तिसरा ठराव विशेष खडाजंगी न होतां पास झाला. परंतु खडाजंगी जी झाली ती उरलेल्या दोन मुद्दयांवर. सोंवळ्या मवाळांना हे ठराव सर्वराष्ट्रीय करणें अहितकारक वाटत होते. बंगालमधील बहिष्कार- चळवळ न्याय्य आहे असा ठराव पास झाला. या ठरावांत इतर प्रांतांनी बहिष्कार सुरू करावा असे नव्हते; अगर सुरू केला तर वाईट असेही नव्हतें. परंतु जें कृत्य बंगालमध्ये चांगले तेच इतर प्रांतांत तरी कसें वाईट ठरेल? बंगालमध्ये फाळणी हें एक जास्त कारण होतें. परंतु फाळणीखेरीज अशीं शेंकडों दुःखें दरएक प्रांतांत होतों कीं त्यांसाठी ही बहिष्कार-चळवळ उचलणें न्याय्य होतें. स्वदेशीचा ठराव विषयनियामक कमिटीत जेव्हां आणला गेला तेव्हां त्यांत, 'स्वार्थत्याग करूनही स्वदेशीच वापरणे इष्ट आहे' असे शब्द घाला असा टिळकांनी आग्रह धरिला. परंतु टिळकांची ही सूचना एकदम फेटाळण्यांत आली. टिळकांनीं मतें मोजा असा आग्रह धरला, परंतु त्यांचें म्हणणें मान्य करण्यांत आलें नाहीं. या एकाच गोष्टीवरून मताधिक्याने कोणतीही गोष्ट करण्याचे या सोवळ्या मंडळींच्या कसें जिवावर येतें तें स्पष्ट दिसतें. टिळक, पाल, अश्विनीकुमार दत्त वगैरे राष्ट्रीय पक्षाची प्रमुख मंडळीं उठून गेली आणि भर सभेत आपण ही सूचना पुढे मांडणार असे टिळकांनी अध्यक्षांस कळविलें. परंतु अध्यक्षांनी स्वतःच ही सूचना ठरावांत घालून दिली आणि तंटा विकोपास जाऊं दिला नाहीं. रास्त व न्याय्य गोष्टीसही नेमस्त कसे आढेवेढे घेत व अरेरावी करीत हें या गोष्टीवरून सूर्यप्रकाशाइतकें स्पष्ट होते.
 आम्हांस या बहिष्कारावरच्या ठरावाचे राहून राहून आश्चर्य वाटतें. स्वदेशी काय किंवा बहिष्कार काय सर्वराष्ट्रीय केल्याशिवाय त्यास जोर कसा यावा? एकाच प्रांतानें उचल करून कसें भागणार? सर्व शरीराचे अवयव जेव्हां आपआपलीं कामें बंद करतील तेव्हांच जीवराजा ताळ्यावर येईल परंतु एक हातच म्हणेल कीं, आपण