पान:तिच्या डायरीची पाने.pdf/३५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मनातलं कुतुहल जागं झालं. तिने प्रश्न टाकला, "तोमार नाम की? तोमार बाबा नाम की? शे की करो?..." आणि शामापेक्षाही सफाईदार बंगालीत उत्तरे मिळाली.
 पहिल्या दिवशीच तिच्या मनाला ताण देण्यापेक्षा, दोन दिवस तिची माहितीच विचारायची नाही असे ठरवून तिला दिलासात दाखल करून घेतले. दिलासा घराचे नियम पाळण्याचे हमीपत्र लिहून घेतले आणि दोन दिवसात मीरा दिलासाच्या वातावरणात मिसळून गेली. दिलासाच्या नियमानुसार तिची वैद्यकीय तपासणी केली. अवध्या पंधरा वर्षाची कळी पण कुंकर घालून अकाली उमलवली गेली होती.
 मीराचे वडील मजुरी करीत. लातूरच्या तेल कारखान्यात ते कामावर होते. माणूस गरीब, प्रामाणिक आणि इमानदार. त्यामुळे मालकाच्या अगदी विश्वासातला. मालक काही वर्षापूर्वी आर्थिक कारणांमुळे थेट आसाममध्ये निघून गेले होते. जाताना पैशाअडक्याबरोबर लक्ष्मण जाधवाच्या कुटुंबालाही घेऊन गेले. लक्ष्मणचा संसार मोठाच होता. सहा मुली नि दोघे नवराबायको. गोहाटीला गेल्यावर दोन मुली आणि धाकटा मुलगा जन्मले. एकदाचा वंशाला दिवा मिळाला. अकराजणांच्या पोटाला भाकर घालण्याची ऐपत मालकातही नव्हती. बंगल्याच्या वळचणीत राहण्यासाठी दोन खोल्या आणि महिना हजार रुपये लक्ष्मणच्या हातावर ठेवले जात. मुली आणि बायको आजूबाजूच्या घरात कामं करीत. मोठी शान्ता, नंतरची मीरा अकरा नि दहा वर्षाच्या. त्यांना घरकामासाठी दुसऱ्या कुटुंबातून ठेवले होते. मीरा रोज सकाळी सात वाजता सवितादीदीकडे कामाला जाई. तिथेच नाश्ता, चहा, जेवण मिळे. दीदी शाळेत टीचर होत्या. बाबूजी कॉलेजात शिकवत. दीदीची चिमुकली करिश्मा सांभाळायचे काम मीरा करी. शिवाय मछली धुवून घ्यायची, नारळाचा छोल काढून द्यायचा, मिक्सर, फूड प्रोसेसर वॉशिंग मशीन, फोन इत्यादी

 आधुनिक उपकरणे सराईतपणे हाताळण्याची तिला सवय होती. मीराला गाण्याची खूप आवड. सवितादीदी रविन्द्र संगीत गाणारी. तिची गाणी ऐकून मीराही खूप गाणी शिकली होती. ती संस्थेत असतानाची गोष्ट. मी एक दिवस "ओ सजना बरखाँ बहार आयी" हे गीत गुणगुणत होते. लगेच मीराने मला मूळ बंगाली गाणे

३०
तिच्या डायरीची पाने