पान:तिच्या डायरीची पाने.pdf/१०८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पती-पत्नी या मुलींवर विविध माध्यमातून जीवनास उभारी देणारे संस्कार करीत. कोणत्याही प्रकारच्या राजकारणापासून दूर राहून समाजाला निर्भय बनविण्याचा वसा उचललेल्या संस्था आणि कार्यकर्ते गांवातील राजकीय खेळ मांडणाऱ्यांना गैरसोयीचे असतात. त्यांचा अडथळा दूर करण्यासाठी अत्यंत गलिच्छ प्रकारचे डाव खेळले जातात. या संस्थापक पती-पत्नींची निर्भय सचोटी, त्यांनी हळूहळू जमा केलेला कार्यकर्त्यांचा संच, लोकप्रियता यांचा धसका घेतलेल्यांनी, महाविद्यालयातील मुलींचे आणि संस्थापकाचे अनैतिक संबंध आहेत त्यासाठी संस्थापकाची पत्नीच सहकार्य करते वगैरे प्रचार सुरू केला. काही पालकांनी मुलींना वसतिगृहातून काढून घरी बसवले. पार्वती मात्र तिथेच राहिली. तिच्या नवऱ्याला हाताशी धरून, त्याला पैशांची लाच देऊन, त्याच्याकडून पोलिसांत तक्रार करविली की त्याची पत्नी पार्वती व संस्थाचालकाचे अनैतिक संबंध आहेत. कोर्टाने सावित्रीची रवानगी जिल्ह्याच्या महिला स्वीकारगृहात केली. या स्वीकारगृहाचे व्यवस्थापन करणाऱ्या ताईना पार्वतीसारख्या सुजाण, अबोल, असहाय्य सुशिक्षित तरुणीने तेथे राहणे योग्य वाटेना. कारण या स्वीकारगृहातील बहुतेक महिला मानसिकदृष्ट्या आजारीच होत्या. त्यांनी आमच्या संस्थेकडे एका महिला कार्यकर्तीव्दारा निरोप केला. पार्वतीची इच्छा आमच्या दिलासागृहात राहण्याची असल्याचा अर्जही पाठवून दिला. आणि एक दिवस पार्वती त्या व्यवस्थापिकाताईबरोबर संस्थेत दाखल झाली. परतताना व्यवस्थापिकाताईंनी आणखीन एक अत्यंत चांगली मुलगी त्या स्वीकारघरात गेल्या तीन वर्षापासून सडते आहे. तिलाही दिलासागृहात प्रवेश द्यावा आणि तिच्या पायावर उभे करावे अशी विनंती केली. दिलासागृहात सहा महिला एकावेळी रहात. त्यावेळी दोन जागा रिकाम्या होत्या. आम्ही त्यांची विनंती मान्य केली. आणि दोन दिवसांनीच लिली आपले सामान आणि पूर्वेतिहासाच्या भल्यामोठ्या फाईलसह दिलासाघरात दाखल झाली.

 लिलीचे अब्बा रेल्वेखात्यात कामाला होते. कोल्हापूरजवळच्या एका गेटवर हिरवा-लाल झेंडा दाखवायची ड्यूटी होती. लिलीला नऊ बहिणी आणि दोन भाऊ. बारा मुलं नि आईबाप असे चौदा जणांचे घर. हातात येणारा पैसा पुरणार कसा? कोल्हापुरात त्यांच्या वडिलांनी बांधलेले पडके घर होते. त्यात चार

रुखसाना
१०३