पान:तिच्या डायरीची पाने.pdf/१०५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लागला. तिला जन्मभर सांभाळण्याचे आश्वासन 'देणे' सोपे होते. पण 'पाळणे' अवघड होते. पुनर्वसन करायचे तर, शिक्षण काहीच नाही. 'जिद्द' होती पण मातृत्वाच्या भावनेने ओथंबलेल्या जिवासमोर अडचणींचा डोंगर दिसे. जिद्द कशी नि कुठून टिकणार? असे मनात येई. सुधीला संदीपानकडे पाठवताना मी अत्यंत अस्वस्थ होते. आपण व्यवहाराचा विचार करताना, आपल्याच विचारांच्या विरुद्ध आचरण करतो आहोत अशी बोच मनाला होती. वकिलांना माझे मन कळत होते. पण तेही मला पुनःपुन्हा व्यवहार सांगत. ग्रामीण भागातील निरक्षर आणि तरुण परित्यक्तांच्या पुनर्वसनाचा विचार करतांना विचारांची चौकट पुनःपुन्हा पारखून घ्यावी, पुढे काय घडू शकते याचे अंदाज घेऊन निर्णय घेणे महत्त्वाचे आहे, असे सतत पटवीत आणि धाडसानेच निर्णय घेतला. पहिली दोन वर्ष सुधीची खबर कळत असे. आमची संवादिनी - कार्यकर्ती भेटूनही आली होती. पण गेल्या पाचसात वर्षात काही कळलं नव्हतं.
 वर्षावर वर्ष उलटत होती. आणि आज सुधी नि बिट्ट समोर उभे होते. "ताई मी हितं घर करतेया. बिट्टू आता पाचवीला गेलाय. चौथीला तालुक्यात तिसरा आला. हितलं शिक्षण चांगलंया. खोली केलीय. तुमचीबी सावली मिळंल…"
 माझ्या डोळ्यातला प्रश्न तिला उमजला असावा. तिनं बिट्टूच्या हातात बिस्किटचा पुडा देत सांगितलं, "बिट्टू, हितल्या लेकरांची वळख करून घे. त्यानला बिस्किटं दे. तू बी हितं होतास बरं का लहानपणी!"

 माझ्याकडे वळून ती बोलू लागली, म्हणाली-
 "ताई, मी ठीक हाय. बिट्टूच्या पपानं मारहाण केली न्हाई. तुमी तवाच बिट्टूच्या नावाने चार एकर रान नि घराचा अर्धा भाग करायला लावला होता. तुमच्या म्होरं कबूल केल्यापरमाने दररोज इस रुपये देत. आता पंचवीस देतात. मी एका दुकानातल्या सुपाऱ्या रोज फोडून देते. ती दुसरीपण बरी हाय. वेगळ्याच ऱ्हातो. पन कधीमधी भेटतो. तिचा तरी काय दोस? आम्ही अडानी. आमचे मायबाप अडानी. नवरापन सातवी झालेला. सरकारचे कायदे कानून आमाला सांगनार तरी कोन? नि कळनार तरी कसे?.... बैलाने जू वढावा तसा संसार वढायचा. पोरगा हीच दौलत. त्याचे पपा येतात अधूनमधून. पन

१००
तिच्या डायरीची पाने