पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

& गीतारद्दस्य अथवा कर्मयोग गीतेंतील विवचनाचे पूर्ण मर्म सहसा लक्षांत भरत नाहीं. यासाठी गीतेंत जे जे विषय किंवा सिद्धान्त आले आहेत त्यांचे शास्रीयरीत्या प्रकरणशः विभाग पाडून, त्यांतलि प्रमुख प्रमुख युक्तिवादांसह गीतारहस्यांत त्याचे प्रथम थोडक्यांत निरूपण केलें आहे; व त्यांतच प्रस्तुत कालच्या चौकस पद्धतीप्रमाणे गीतेच्या प्रमुख सिद्धान्तांची इतर धर्मातील व तत्त्वज्ञानांतील सिद्धान्तांशी प्रसंगानुसार संक्षेपानें तुलना करून दाखविली आहे. या पुस्तकांत प्रथम दिलेला गीतारहस्य हा निबंध अशा रीतीनें कर्मयोगावर एक लहानसा पण स्वतंत्र ग्रंथच आहे असे म्हणतां येईल. पण कांहं म्ह्टलें तरी अशा प्रकारच्या सामान्य निरूपणांत गीतेतील सर्व लोकांचा व्यक्तिशः पूर्ण विचार करणे शक्य नव्हतें. म्हणून अखेर गीतेचे सर्व लोकशः भाषान्तर देऊन पूर्वापर संदर्भ लक्षांत येण्यास, किंवा पूर्वीच्या टीकाकारांनी आपल्या संप्रदायसिद्धयर्थ गीतेंतील कांहं श्लोकांची कशी ओढाताण केली आहे (गी.३.१७- १९; ६.३; व १८.२ पहा)हें स्पष्ट दाखविण्यास, अगर गीतारहस्यातसागितलेल्या सिद्धान्तांपैकीं गीतेंत:ल संवादात्मक पद्धतीप्रमाणे कोणकोणते सिद्धान्त गीतंत कोठेकोठे व कसे आले आहत हें दाखविण्यास, टीकेच्या रूपानें भाषान्तरास जोडूनच जागोजाग मुबलक टीका दिल्या आहेत. या पद्धतीनें कांहीं मजकुराची द्विरुक्तिझाली आहे खरी; पण गीताग्रंथाच्या तात्पर्याबद्दल सामान्य वाचकांचा सध्यांजो गैरसमज झालेला आह ती अन्य रीतीनें पूर्ण दूर होणे शक्य नाही, असें वाटल्यावरून गीतारहस्यविवेचन गीतेच्या भाषान्तरापासून निराळे काढेिलें आहे;आणि त्यामुळे वेदान्त, मीमांसा, भक्ति वगैरे बाबतीत गीतेचे जे सिद्धान्त आहेत, ते भारत, सांख्यशास्र, वेदान्तसूत्रे, उपनिषदें, मीमांसा वगैरे मूल ग्रंथांतून कसे व कोठकोठे आले आहूत, हें पूर्वेतिहासांसहसाधार दाखविण्यास, किंवा संन्यास व कर्मयोग या दोन मार्गात भद काय हें स्पष्ट करून सांगण्यास, अगर गीतेची इतर धर्ममतांशीं व तत्त्वज्ञानांशीं तुलना करून व्यावहारिक कर्मदृष्टया गीतेचे महत्त्व काय याचे योग्य निरूपण करण्यास, चांगली सोय झाली आहे. गीतेवर अनेक प्रकारच्या टीका होऊन गीतार्थ अनेकांनी अनेक प्रकारें जर प्रतिपादिला नसता तर आमच्या ग्रंथांतील सिद्धान्तास आधारभूत असलेली मूळ संस्कृत वचनें ठिकठिकाणीं देण्याचे कांहीं कारण नव्हतें पण हल्लींचा काल तसा नसून आम्हीं सांगितलेला गीतार्थ किंवा सिद्धान्त बरोबर आहे की नाही, याबद्दल कित्येकांस शंका येण्याचा संभव आहे म्हणून आमच्या म्हणण्यास आधार काय याचा स्थलनिर्देश सर्वत्र केला असून, मुख्य् मुख्य ठिकाणीं तर मूळ संस्कृत वचनेंच भाषान्तरासह दाखल केली आहेत. पैकी बरीच वचनें वेदान्तग्रंथांतून सामान्यतः प्रमाणार्थ घेण्यांत येत असल्यामुळे वाचकांस त्यांची सहजगत्या माहिती होऊन