पान:केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf/३०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 थेंबे थेंबे तळे साचे 

 थेंबे थेंबे तळे साचे त्याचप्रमाणे पै पै जमवून पैसा वाढे हेही खरं आहे. आपल्या मिळकतीतला शक्य तेवढा वाटा बाजूला टाकून बचत करण्याचं तंत्र आपल्याला आता नवीन नाही. बँका-बँकातून ते गावोगावी पोहोचलंय. पण अर्धशिक्षित, फक्त अक्षर ओळख असणाऱ्या काहींना आणि घरच्या कामाचा मोठा बारदाना असणान्या आम्हा बायकांना तर बँक सोयीची वाटत नाही. एकूण उद्योजकतेचा किंवा स्वयंरोजगाराचा विचार ग्रामीण महिलांच्या बाबतीत करायचा झाला तर ग्रामीण युवकांपेक्षा काही वेगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतील. ज्ञान प्रबोधिनी संस्थेने ग्रामविकसन विभागातर्फे १९९५ साली बचत गटांना सुरुवात केली. गावातल्या बायांनी आपल्याला जमेल अशी थोडीशी रक्कम म्हणजे महिना १०रु. एकत्र करायचे. आणि महिन्यामहिन्यांनी वाढत जाणारी ही रक्कम आपल्यातल्याच बाईच्या अडीअडचणींसाठी तिला व्याजाने वापरायला द्यायची अशी सुरुवात झाली. यातून आर्थिक व्यवहाराची सवय व्हायला लागली.

 हळूहळू गटातल्याच बायका पैसे जमवणे, वाटणे, त्याची वसूली, व्याजाची रक्कम जमा करणे आणि पुन्हा वाटप करणे असे व्यवहार स्वत: करू लागल्या. एकाचे शंभर गट झाले. पैशाच्या व्यवहाराची सवय अंगवळणी पडल्यावर फक्त अडीअडचणीला पैसे मागण्याऐवजी ह्या पैश्यांच्या आधारावर पैसे मिळवण्याचा विचार सुरू केला. आणि हाच तर या गटांचा मुख्य उद्देश होता. पैशातून पैसा निर्माण करण्यासाठी म्हणजेच उद्योग करण्यासाठी भांडवल म्हणून बचत गटातली रक्कम उचलली जावू लागली. बी रुजवल्यापासून रोप तयार होऊन पीक हाती यायला काही महिन्यांचा काळ द्यावा लागतो. त्या रोपासाठी मेहनत घ्यावी लागते. बचत गटाचं हे रोप रुजायला मात्र काही वर्ष लागली आणि आता ५ वर्षांनंतर त्याला फळं धरू लागली आहेत आणि या रोपाला ही फळं धरण्यासाठी अनेकांनी अनेक प्रकारची मेहनत घेतली आहे. एरवी, घराबाहेर पडणं मुश्किल होतं. परंतु गटभावनेमुळे सर्वजणी महिला असल्यानं घराबाहेर पडून, चार माणसांत मिसळणं शक्य झालं. त्यातून आत्मविश्वास वाढून काहीतरी करण्याची उर्मी वाटू लागली. ह्या उर्मीचं बऱ्याच जणींनी उद्योग करण्यात रुपांतर केलं. याला उद्योग म्हणण्यापेक्षा स्वयंरोजगार म्हणणं अधिक उचित वांटतं. ग्रामीण भागाचा विचार केला तर युवकांपेक्षा महिलांसाठी स्वयंरोजगाराचं काम करणं जास्त अवघड आहे. त्यांच्यासाठी काही प्रक्रिया जाणीवपूर्वक वेगळ्या पध्दतीने हाताळायला लागतात.

 एखादीकडे कौशल्य असते, पणं भांडवल नसते, एखादीकड़े कष्ट करण्याची तयारी असते पण लोकांशी आत्मविश्वासाने बोलण्यासाठी धिटाई नसते. एखादीकडे उद्योग करण्याची मनापासून तयारी असते पण घरून

कर्ज हे साधन आहे साध्य नव्हे.    २५