क्रम दिसतो. कारण श्लेष्म्याचें संग्रह किंवा संघटना हैं कार्यच देहाचा आरंभ आहे. व
या वाक्यांत कफपित्तवायु असा क्रम स्वीकारला आहे. परंतु बहुतेक सर्व ठिकाणी विशेषतः निदान चिकित्साप्रकारणीं वायु पित्त कफ असाच क्रम स्वीकारलेला आहे, व वायूचें महत्वहि त्याचप्रमाणे वर्णिले आहे.
या वाक्यांनीं धातु मळ त्याचप्रमाणे कफपित्ताहून वायुरव तंत्र च श्रेष्ठ असल्याचे सांगितलें आहे.
वायुः पित्तं कपश्चेति त्रयो दोषाः समासतः । ( वाग्भट. सू. अ. १ )
वायु पित्तं कफश्चोक्त: शारीरो दोषसंग्रहः ॥ (चरक सू. अ. १ . ५६ )
अशा प्रकारें वायुपित्तकफांचा अनुक्रमच सर्वत्र आहे. व कफाचा उत्पादक या नात्याने महत्वाचा संबंध असतां तो मार्गे पडून कफाचे पूर्वी वायु कां यावा? असा प्रश्न सहजच उत्पन्न होतो व त्याचा विचार करणें अवश्य आहे.
याचें कारण असें आहे की उत्पादनक्रमामध्ये जरी दोषांपैकी कफ प्रमुख किंवा प्रथम असला तरी विकृतीचे प्रसंगीं मात्र वायूचेंच सामर्थ्य अधिक असते. शरीराच्या अनेकविध व्यापारांचा उगम नित्य चालणाऱ्या चलनवलनापासून होत असतो. गति-हाल चाल - हा मुख्य जीवनव्यापार आहे. हा व्यापार ' वायूचा हे ' स्पष्ट आहे. या हाल चालीमध्ये ज्यावेळी अडथळा-प्रतिबंध होतो त्यावेळीच रोगाला स्वरूप येत असतें. कित्येक विकारांत, कफामुळे उत्पन्न झालेला अभिष्यंद अथवा पित्तामुळे होणारा अभिताप ही वायूचे गतीला विधातक कारणे असतात. हे खरे असले तरी रोगाला स्पष्ट स्वरूप येण्याला कोठे तरी या गतीमध्ये व्याघाताची अवश्यकता असते.