या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
"असं वाटलं मला तुझ्याकडे बघून. मूलबील ?"
"मुलगी आहे."
"आनंदात आहेस ना?"
हा कसला प्रश्न ? असं काहीतरी फालतू बोलण्यासाठी ती मला इथे घेऊन आली?
मी काही बोलले नाही तेव्हा ती म्हणाली, "रागावू नको. आयुष्याचा शेवट दिसायला लागला की, माणसाला काही हिशोब मिटवावे लागतात. तुला फक्त एवढंच सांगायचं होतं की मी तुला क्षमा केलीय."
छातीत एकदम अडकलेल्या श्वासामुळे मी बोलू शकले नाही. तू कोण मला क्षमा करणार असं मी विचारण्यापूर्वीच गुडबाय म्हणून ती निघूनही गेली होती.
- ★ -
अवन्तिका – ६१