पान:अशोक.pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कुणबी. १८३ आहे, तेंही जातां जातां सांगितलें पाहिजे. तें हें कीं, अनेक रेल्वेंना कोणत्याही प्रकारचें कुंपण नसल्यामुळे गुरें आगगाड्यांखालीं चिरडून मरतात. समर्थाशीं टकर घेण्याची लोकांना ऐपत नसल्यानें रेल्वेकंपन्यांना लोकांचें नुकसान भरून देण्याची पाळी येत नाहीं, आणि लोक मात्र नाहक बुडतात. दरी, डोंगर, ओहोळांनजीकच्या चांगल्या चांगल्या जमिनींची किंमत घटत चालली आहे. कारण विचारतां असें सांगतात कीं, त्या बाजूला हरणाडुकरांचा फार त्रास होतो. झांवळ झांवळ असतांच कोल्हेहुक गांवकुसापाशीं ऐकू येते, व हरणें इतकीं धीष्ट झालीं आहेत कीं, ढवळ्या दिवसा राखणदाराच्या उशाशीं येऊन पीक खातात, आणि ओरडलें, धोंडे फॅकले तरी हालत नाहींत. राखणाच्या दिवसांत कुणब्याला आपल्या आईच्या दुधाची हरघर्डीं आठवण होत असावी. दिवसभर गोफण चालवून दंड भरून येतात, आणि हर्र हुई, हां आं करतां करतां घसा कोरडा पडून अखेर बसतो, तरी पांखरें जनावरें दाद देत नाहींत. पुन्हां चांदणी निघाली कीं लागलींच गोफण, आरडाओरड, टिनचे डबे बडवून आवाज काढणें जें सुरू होतें तें फटफटेपर्थत. जरा विसंबलें कीं सबंध शेत थोर्ट होऊन जावयाचें. हा काळाचा व मनुष्यशक्तीचा किती प्रचंड खर्च आहे ? एका "वयेोवृद्ध पाटलानें असें सांगितलें कीं पूर्वी घोडयावर माणस पाहिला कीं, हरिणें लांब पळत, तीं आतां बेधडक घोड्याजवळून जातात. देवानें पोटापुरतें ज्ञान सर्वाना दिलें आहे. एका शिकारी पारशी गृहस्थानें सांगितले कीं मी स्वतः जंगलांतून पिस्तुलाशिवाय चाललों तरी हरणें धूम पळतात, तीच शिकार न करणारा शिपाई गोळ्या बंदूक घेऊन चालला तरी त्याला न भितां जरा दूरवर मात्र उभीं राहतात. हरणासारखी काळजी कोणी करीत नाहीं म्हणून 'हरिण-काळजी’ शब्दप्रयोग प्रचारात आला. परंतु आतां पहावें तों ' विश्वासापगमादभिन्नगतयः शब्द सहन्ते मृगाः ” हा ऋषींच्या आश्रमाचा देखावा शिवारभर नजरेस पडतो. ज्याजवळ बंदुक असते त्याला बार काढण्यास बोलवावें तर