या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३ | ९ ऑक्टोबर १९८० | निफाड सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत उसाला ३०० रुपये टन हा भाव मिळायला हवा असा ठराव संमत |
२४ | १० नोव्हेंबर १९८० | खेरवाडी येथील 'रेल रोको'मध्ये दोन शेतकरी पोलीस गोळीबारात हुतात्मा. संघटनेतर्फे हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा होतो. |
२५ | ११ नोव्हेंबर १९८० | नाशिक कोर्टात शरद जोशी यांना हजर केले गेले. इतर ३१,००० शेतकरीही अटकेत |
२६ | २७ नोव्हेंबर १९८० | मुख्यमंत्री अंतुले यांच्याकडून टनाला रुपये ३०० हा भाव मंजूर |
२७ | १४ डिसेंबर १९८० | पिंपळगाव बसवंत येथे विजय मेळावा |
२८ | १ फेब्रुवारी १९८१ | निपाणीतील सुभाष जोशी यांच्यासमवेत पहिली सभा |
२९ | २४ फेब्रुवारी १९८१ | तंबाखू शेतकरी व विडी कामगार यांची निपाणीत पहिली संयुक्त सभा. सात प्रमुख मागण्या सादर. |
३० | २६ फेब्रुवारी १९८१ | अंबाजोगाई येथे प्रशिक्षण शिबिर सुरू |
३१ | १४ मार्च १९८१ | निपाणी तंबाखू आंदोलन सुरू, १५,००० शेतकरी 'रास्ता रोको'त सामील. |
३२ | ६ एप्रिल १९८१ | पोलिस गोळीबारात १२ शेतकरी हुतात्मे. शरद जोशी बेल्लारी तुरुंगात. |
३३ | १ जानेवारी १९८२ | संघटनेचे सटाणा येथील पहिले अधिवेशन सुरू. खुल्या अधिवेशनाला तीन लाख शेतकरी हजर. |
३४ | २८ मे १९८२ | पंजाबातील 'भारती किसान युनियन'ची बैठक |
३५ | २८ जून १९८२ | महाराष्ट्रात दूध आंदोलन सुरू. चार दिवसांनी माघार. |
३६ | ३० ऑक्टोबर १९८२ | वर्धा येथे देशभरातील शेतकरी प्रतिनिधींचा मेळावा व 'आंतरराज्य समन्वय समिती'ची स्थापना |
३७ | ३१ ऑक्टोबर १९८२ | पत्नी लीला जोशी यांचे पुणे येथे निधन |
३८ | २० फेब्रुवारी १९८३ | 'शेतकरी संघटना - विचार आणि कार्यपद्धती','प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश' व 'भारतीय शेतीची पराधीनता' ही पुस्तके प्रकाशित |
३९ | ६ एप्रिल १९८३ | 'शेतकरी संघटक' पाक्षिक सुरू |
४९८ ■ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा