आत्मारामाची भूपाळी
Jump to navigation
Jump to search
उठा प्रातःकाळ झाला । आत्माराम पाहूं चला ।
हा समयो जरिं टळला । तरि अंतरला श्रीराम ॥ ध्रु ॥
जीव-शिव दोघेजण । भरत आणि शत्रुघन ।
आला बंधु लक्षुमण । मन उन्मन होऊनी ॥१॥
विवेक वसिष्ठ सदगुरु । संतसज्जन मुनीश्वरु ।
करिती नामाचा गजरु । हर्षनिर्भर होउनियां ॥२॥
सात्त्विक सुमंत प्रधान । नगरवासी अवघे जन ।
आला वायूला नंदन । श्रीचरण पाहावया ॥३॥
![]() |
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. | ![]() |
