पान:छन्दोरचना.djvu/382

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ፣ጳኛጻዔ जाति-जीवन याप्रमाणे फिरवून हा योग तिस-या नि चौथ्या मात्रांच्या ठिकाणीं आणला कीं चरण गोड लागतो. आणखीहि ओक मोरोपन्ती आर्या घेर्ट्झ या.

  • अर्जुनसम वीरें नैसे मागे आता पुढे न व्हायाचा

V, हा वीररसौघ नगहि न झुरेल झुरेल जो लवायाचा ” दुस-या आर्याधींतील र-र हा संयोग पाचव्या नि सहाव्या मात्रांच्या ठिकाणीं आहे तो कटु लागतो. पुन्हा म्हणतांना नग या शब्दाचा न-ग असा जो विग्रह होतो तोहि कटु लागतो. शब्दांचा क्रम फिरवून जर ही ओळ ‘ वीर-सौघच हा, नग नुरेल शुरणार जो लवायाचा” अशी केली तर रत्र यांचा योग तिस-या नि चौथ्या मात्रांच्या ठिकाणीं येथून ती गोड लागतो. मोरोपन्ताच्याच ‘ नलगे नमतें लागे आठा अङ्गांत करुनि आठ वण शुद्धरिशी दीनातें देवा, करितां मनांत आठवण” (मोम २/१२९) या आर्येच्या पूर्वार्धात 'ठ-व” यांचा योग ७ व्या नि ८ व्या मात्रांवर झाला असल्याने तो कर्णकटु लागत नाही. (४) पद्मगणाच्या [-- , ७ - ७ ] या प्रकाराचा झुपयोग कचितच होतो; पण कोठे तो असल्यास त्या गणाच्या मध्यावर आणि गणान्तीं खटका येती तेथे पदसमाप्ति अवश्य व्हायला हवी. ‘ फिरता फकीर । तू तव चरणों ” (गोवा १६) हा चरण मुळीच कटु लागत नाही; पण 'छान्दिष्ट भिक्षु । तू, तव चरणीं? असा चरण कटु लागतो. * । फिरवी तुझ्या य- शाची महती? (गोवा ५६) आणि * । तारे निळ्या न - भीं लकलकती? (गोवा ५९) हे चरण कटु लागतात. शब्दक्रम थोडा फिरवून हे चरण ' तुझ्या यशाची फिरवी महती, ' ' निळ्या नभीं लकलकती तारे? असे केले की सारी कटुता पार निघून जाते. (५) चरणारम्भीं चार वा पाच मात्रांचा जी आद्यतालकपूर्व गण (--), (७ --) वा (- ७ -) या स्वरूपाचा येतो त्याच्या अन्तीं पदसमाप्ति व्हायला हवी.