पान:छन्दोरचना.djvu/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ५९ यमक, यति, अक्षर आणि गण

  • त्या पुरीत सर्व लोक

जाहले झुदण्डशोक किन्तु तो न रामवीर जाउँ दे स्वकीय धीर. सर्व पौर कान्तिहीन जाहले अतीव दीन तो महान्त अन्तराय बालवा जनास ' ह्याय '.' वृत्तांत अथवा जातींत सारख्या लगक्रमाचे शब्द जर सारख्या अन्तरांनी ये शकत असतील तर तेथे चरणामध्येच यमकें साधून कवीस पदलालित्य दाखवावेसें वाटतें. आणि हीं यमकें तरङ्गावलीप्रमाणे आल्हाददायक होतात; जसें.

  • तो शर गरधरवरसा, पविसा रावेसा स्मरारिसायकसा' (मोरोपन्त )
  • न धरी बा दर हा दर सादर दे वाजवू पुन्हा नीट' (मोरोपन्त)

जातेिरचनेत विशेषतः अष्टमात्रक आवर्तनाच्या जातींत प्रत्येक आवर्तनांत तिस-या मात्रेवर खण्डन करून तेथे यमकें साधतात; जसें, “सुन्दरा मनामधि। भरलेि जरा नहेि। ठरलेि हवेलिंत । शिरलेि मोत्याचा । भाङ्ग' यमकान्तीं याप्रमाणे खटके हे असतात; तेथे थोडे थाम्बणे अवश्य असतें. तसें न केल्यास यमकांची प्रतीतेि कानास होत नाही. तेव्हा तसें करितांना शब्द भलल्या ठिकाणीं तुटून रसभङ्ग हो # नये “वाजत गाजत साजत आज तया जतन करुनि आणा हो' (मोविप४) ही ओळ अर्थाकडे लक्ष देथून सरळ म्हटली असतां वाजत, गाजत, साजत या तीनच शब्दांतील यमक प्रतीत होतें; आजत याजत या दोन अक्षरावलींतील यमक प्रतीत होत नाही; कारण, म्हणतांना आजत-याजत असे तुकडे न पडतां ते 'आज तया' आणि 'जतन' असे पडतात “रामा, मनोज्ञगुणधामा, पलाशजनतामारणैकनिरता, कामारोिचित्तसदना, मारुतिप्रियसुनामा, नशत्रुविजिता