पान:छन्दोरचना.djvu/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इनच्या सौजन्याने ५८ राही जयांचे यश शुभ्र येथे, येतें जयांचे स्मरणे दृगम्बू.” (तासक ४४) यमकान्तीं खटका असतो चरणान्तर्गत विरामामुळे जेथे चरणाचे दोन विभाग पडतात तेथे त्यांच्या अन्तीं ( आणि काचित् केव्हा आरम्भ ) यमक साधण्यांत येते. याचीं झुदाहरणे मागे (पृ ४९-५० पहा) दिलींच आहेत. आणखीह ओकदेशन झुदाहरणे घेश्रू (१) “ असेल सामथ्र्य तरीच चापीं मौर्वीसि जोडा, विशिखासि सोडा नसेल सामथ्र्य तथापि सारे हस्तासि जोडा, मम बन्धु सोडा.” (मोकुल ८॥२७) (२) * हे वो कोडे कोन निवाडे औस्या लक्षा काय विवक्षा घेतो चापा स्पर्शनि कोपा चन्दीं दक्षा हेचि परीक्षा.” (लस्व ५॥३२) येथे चरणान्तीं यमक न साधितां चरणविभागान्तीं साधिलें आहे . परन्तु अॅवढ्यावरून चरणविभागाला चरण मानून चतुष्पदीची अष्टपदी करण्याचें प्रयोजन नाही. जेथे चरणाचे अशा रीतीने पडणारे दोन विभाग लगाक्रमदृष्टयाहेि अभिन्न असतात तेथे मात्र चरणाची अद्पट करून चतुष्पदीची अष्टपदी करण्याकडे प्रवृत्ति होते; झुदाहरणार्थ ८४ किन्तु तो न रामवीर जाउं दे स्वकीय' धीर सर्व पौर कान्तिहीन जाहले अतीव दीन तो महान्त अन्तराय बोलवी जनांस 'हाय' !” (राप ५॥८४) हा श्लोक निर्यमक चञ्चला [। – ७ - ७ ।– ७ - ७ - ७ - ७ ।– ७ - ७] वृत्ताचा आहे. परन्तु मध्यान्तिक यमक साधल्यामुळे प्रत्येक चरणाचे दोन अगदी ओकसारखे तुकडे पडतात; आणि अॅका श्लोकाचे पुढील प्रमाणे समाििनकावृत्तां तील दोन सयमक श्लोक होतात ुज़ु 1