पान:छन्दोरचना.djvu/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने । तू जगाची कोटिभास्करवत् प्रभा, । हृदयमानस ज्या प्रकाशे । दिव्य जीवित भूवरी स्वगतलें झुपभोगिती, । ओक तव तेजस्वि कणही ॥ लागतां क्षणि पेटतो आत्मा जशी की | दिव्य ज्योती । जी जगाला दाखवीते मार्ग पुढचा ” याप्रमाणे केली तर ती अस्वाभाविक होलील का ? ही चरणरचना अधिक सोयीची तरी आहेच आहे. प्रत्येक चरणांत टाळी चरणारम्भींच पडत असल्याने वाचकाचा गोन्धळ होण्याचा सम्भव अगदी नाही. चरणरचनेचा प्रश्न क्षणभर कडेला ठेवून शब्दक्रमाचाच विचार केला तर तोहि अपरिहार्यपणे स्वाभाविक आणि अपरिवर्तनीय वाटतो का ? लय साधण्यासाठी भावार्थोचित शब्द सोडून झुणा समर्पक असा शब्द योजण्याची आपत्ति आलीच नाही का? लयबद्धते साठी वाक्यांतील शब्दक्रम फिरवावा लागला की नाही ? भावार्थ हा लयबद्ध असला तरी भावनेच्या परिवर्तनाप्रमाणे निरनिराळ्या चरणांत निरनिराळ्या मात्रांचीं आवर्तनें कां ये नयेत ? केवळ समदीर्घ चरण लिहिण्याच्या बन्धनाने प्रतिभेच्या मुक्त विलासास अडथळा होतो तर सबन्ध दीर्घ काव्य एका ठराविक आवर्तनांत लिहिण्याच्या बन्धनाने अडथळा कां होचूं नये ? अधिक अनुभवासाठी कवि भ. श्री. पण्डित यांनी षण्मात्रक आवर्तनांत रचलेलें पुढील स्वैरपद्य पहा “मङ्गलमय सुप्रभात भूठ ऽ नीज अजुनि नयनांवर मलुल म्हणुने रजनिवदन देशी अङ्गास तूहि हळुहळु तम दूर सरे