पान:काश्मीर वर्णन.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १४७ )

झाला. हा दुसऱ्या कुलांतील होता. यानें आठ वर्षे राज्य केलें. नंतर - संधि- तो सर्व गुण जयेंद्र गादीवर बसला. हा आजानुबाहु असून पृथुराजासारखा पराक्रमी व मोठा शूर होता. मति नांवाचा त्याचा प्रधान होता. संपन्न होता म्हणून राजाचा त्याजवर मोठा भरंवसा व प्रेम होतें. ही गोष्ट राजाजवळ राहणाऱ्या अन्य लोकांस सहन न होऊन त्यांतील एकानें राजाजवळ अशी चुगली केली की, प्रधानाच्या मनांत आपली गादी बळकाविण्याचें आहे. ही गोष्ट ऐकून राजाची प्रधानावर इतराजी झाली आणि त्यानें त्यास दहा वर्षे कैदेंत ठेवून अखेर त्यास सुळ दिलें. ईशान नांवाचा प्रधानाचा गुरु होता. त्यास हें वर्तमान कळून फार वाईट वाटलें. मंत्री संधिमति याच्या मस्तकावर विधात्यानें असें लिहून ठेविलें होतें कीं, तो मुळी गेल्यावर दहा वर्षे राज्य करील. त्या लेखा- प्रमाणें योगिनी नांवाच्या वनदेवतांनी त्याचें प्रेत घेऊन तें सजीव केलें; कारण, तो त्यांस भोग देण्यास पाहिजे होता. मध्यंतरी जयेंद्र राजा मरण पावला आणि कांहीं काळ गादी रिकामी होती. पुढें संधिमति हा राज्यावर येऊन बसला. त्यानें आर्यराज असें नांव धारण केलें. हा मोठा शिवभक्त होता. तो दररोज एक हजार शिव- लिंगांची स्थापना करून त्यांची पूजा करी. त्यांतील लिंगे अद्यापि कोठें कोठें क्वचित् दृष्टीस पडतात म्हणून सांगतात. याच्या मागून पुनः गोनर्द घराण्यांतील- मेघवाहन गादीवर बसला. हा बौद्ध धर्माचा मोठा वाली होता. यानें कांहीं गांव वसविलें आणि