Jump to content

पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/56

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

इत्यादी खरेदी करण्याचा अधिकार होता. शेतकऱ्यांचे यात नुकसान होते आहे हे ध्यानात घेऊन राजाने देवांचा हक्क तात्काळ काढून घेतला. राजांनी २२ जून १६७६ रोजी देवांना कळविले की की की तुम्ही रयतेपासून कमी भावाने धान्य घेऊ नये. तुम्हाला देवस्थानासाठी लागेल ते सर्व धान्य स्वराज्याच्या खजिन्यामधून दिले जाईल. दैनंदिन खर्च होईल तो लिहून ठेवणे व खर्च खजिन्यातून दिला जाईल. आपले देवस्थान आहे म्हणून त्यांना खास अशी सवलत राजाने दिलेली नाही.

 राजाचे धार्मिक धोरण हे स्वधर्माबद्दल प्रेम व आदरभाव दर्शविणारे असे होते. शिवाजी केवळ हिंदू धर्माचा राजा आहे असा स्वार्थी प्रचार काही लोक आपल्या राजकिय स्वार्थासाठी राजाचे खोटे व हीन रूप मांडत आहेत. यातून काही क्षणापुरता कदाचित त्यांच्या राजकिय स्वार्थ साधेलही, परंतु राजाचे असे विकृत रुप मांडणे हा शिवाजीचा घोर अपमान आहे. राजाच्या उत्तुंग व विशाल व्यक्तिमत्वाला हे कमीपणा आणणारे आहे.

 शिवाजीराजांचा स्त्रीविषयक दृष्टीकोण

 राजाचा परस्त्रीविषयीचा दृष्टीकोन हा तत्कालीन स्थितीत अनन्यसाधारण होता यात काही वाद नाही. सुलतान दरबाराचे सरदार आणि वतनदार यांच्या स्त्रियांवर अत्याचार होत, त्यांना पळवून नेणे, अब्रू लुटणे हा जणू आपला हक्कच आहे असे लुटारू सैन्य माने. स्वराज्याच्या सैन्याची स्त्रियांबाबतची वागणूक अगदी वेगळी असे हे सर्वमान्य आहे. खाफीखान वगैरे अनेक लेखकांनी मराठा सैन्याच्या या गुणाबद्दल व शिवाजीच्या स्त्रियांबद्दलच्या धोरणाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. स्वत: मोगल सम्राट औरंगजेब राजाच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर म्हणाला, 'आपल्या हातात पडलेल्या शत्रूच्या स्त्रियांच्या अब्रूची कदर करणारा एक महावीर मरण पावला.' राजाच्या चरित्रात स्त्रीयांविषयक उदार धोरणाची अनेक उदाहणे मिळतात.

 मुरजे येथील रंगो त्रिमल वाकडे कुलकर्णी ब्राह्मण यांच्याकडील लग्नाचे वऱ्हाड

आले. वऱ्हाडात एक विधवा महिला होती.रंगो त्रिमल यांनी त्या विधवेशी बदवर्तन केले. राजांच्या कानावर ही गोष्ट केली. रंगो त्रिमल वाकडे यांच्या पूर्वी एका पाटलाने बदअंमल केला म्हणून त्याचे हातपाय तोडल्याची शिक्षा राजानी केल्याचे त्याला माहीत होते. रंगो कुलकर्णी घाबरला. आता शिवाजीराजे आपल्याला जीवानिशी मारतील या भयाने राजांच्या शत्रुपक्षाकडील चंद्रराव मोरे यांच्याकडे आश्रयाला गेले. चंद्ररावाने त्यांना आश्रय दिला. पण हे फार काळ टिकले नाही, कारण रंगोबा लवकरच मरण पावले. राजे आपल्या सैन्याला हुकूम देताना कोणत्याही परिस्थितीत

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / ५३