भरपूर शेते असतील, त्याचे हाताखाली मोजमजुरी करून आपला निर्वाह करावा तर एकंदर सर्व ठिकाणी... पाळीपाळीने शेते पडीत टाकण्यापुरती भरपूर शेते शेतकऱ्याजवळ उरलेली नाहीत. तेणे करून शेतास विसावा न मिळता, ती एकंदर सर्सहा नापीक झाली आहेत. त्यांत पूर्वीप्रमाणे पिके देण्यापुरते सत्त्व शिल्लक राहिले नाही. त्यांना आपल्याच कुटुंबाचा निर्वाह करिता करिता नाकी दम येतात. तेव्हा त्यांनी आपल्या गरीब शेतकरी बांधवास मोजमजुरी देऊन पोसावे असे कसे होईल बरे?' (पृष्ठ क्र.२०५)
कर्ज मिळवून अडचणीतून तात्पुरते दूर व्हावे म्हणावे, तर...
'... खानदान चालीच्या सभ्य सावकारांनी आपला देवघेवीचा व्यापार बंद केला आहे; तथापि बहुतेक ब्राह्मण व मारवाडी सावकार... अक्षरशून्य शेतकऱ्यांबरोबर देवघेवी करितात. त्या अशा, की प्रथम ते, अडचणीत पडलेल्या शेतकऱ्यास फुटकी कवडी न देता, त्याजपासून लिहून घेतलेल्या कर्जरोख्यावरून...लवाद कोर्टात हुकूमनामे करून घेऊन नंतर व्याजमनुती कापून घेऊन, बाकीच्या रकमा त्यांच्या पदरात टाकतात. या सोवळ्या व अहिंसक सावकारांपासून कुटुंबवत्सल, अज्ञानी भोळ्या शेतकऱ्यांची शेते क्वचित परत मिळतात.'
(पृष्ठ क्र.२११)
भारताच्या शहरीकरणाला सुरुवात झाली आहे. शहरे, सरकारी यंत्रणा ही भटशाहीच्या संपूर्ण प्रभावाखाली.
'एकट्या पुणे शहरांतील म्युनिसिपालिटीचे आताचे वार्षिक उत्पन्न सांगली संस्थानचे उत्पन्नाची बरोबरी करू लागले. त्याचप्रमाणे मुंबईतील टोलेजंग म्युनिसिपालिटीच्या उत्पन्नाचे भरीस पंत-सचिवासारखी दहा-बारा संस्थाने घातली तरी तो खड्डा भरून येणे नाही... जिकडे पहावे तिकडे दुतर्फा चिरेबंदी गटारे बांधलेले विस्तीर्ण रस्ते, चहुकडे विलायती खांबावर कंदिलाची रोषणाई, जागोजाग विलायती खापरी व लोखंडी नळांसहित पाण्याच्या तोट्या, मुत्र्या, कचऱ्याच्या गाडी वगैरे सामानांचा थाट जमला आहे.' (पृष्ठ क्र.२२९)
'शासन आपले सर्व कामगारांस मन मानेल तसे पगार व पेन्शन देण्याचे इराद्याने नाना प्रकारचे नित्य नित्य नवे कर शेतकऱ्यांचे बोडक्यावर बसवून, त्यांचे द्रव्य मोठ्या हिकमतीने गोळा करू लागल्यामतुळे शेतकरी अट्टल कर्जबाजारी झाले आहेत.' (पृष्ठ क्र.२२९)
सैन्यातील साध्या सोजिराच्या राहणीमानाची शेतकऱ्याच्या हालाखीशी जोतीबांनी केलेली तुलना मुळातच वाचून पहायला पाहिजे.