Jump to content

पान:महाबळेश्वर.djvu/152

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ११७ )



लागलींच नेलेले प्रकारची व त्याच नमुन्याची राब तयार होऊं शकत नाहीं. अशी स्थिति एकसारखी बरेच दिवस चालत आल्यामुळे आतां राब मिळण्याचा तर भरंसा नसल्यामुळे फार कठीण दिवस येऊन गुदरले आहेत. आणि त्यांचा परिणाम असा होऊ लागला आहे कीं, जेथें पांच मण धान्य उत्पन्न होण्याचें शेत आहे तेथें दोन तीन मण धान्य घेऊन तोंडांत मारल्यासारखे गप्प बसावें लागत आहे. अशी शेतकऱ्यांची स्थिति असल्यामुळे त्यांना सदा भीक झाली आहे, आणि यामुळे ऐन पावसाळ्यांत त्यांना सावकारांच्या हातीपायीं पडून कशीतरी महिन्या- दोन महेिन्यांनीं पुढलें पीक येईपर्यंत जगण्याची तरतूद करावी लागते. यासाठी सरकारांनीं यांजवर मेहरबानी करून यांस जास्त सवलत दिली असतां गोरगरीबांवर अनिर्वचनीय उपकार होणार आहेत. ती अशी कीं सरकारच्या महत्वाच्या उत्पन्नाचीं जंगली झाडे शिवाय करून बाकीच्या कोणत्याही झाडांचा पाचोळा, वाळलेल्या फांद्या वगैरे जंगलांतून शेतकरी लोकांस थोडथोडया नेण्याची मोकळीक झाली ह्मणजे त्यांच्या शेतकामात चांगलें