Jump to content

पान:मनतरंग.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

"...पिवळे तांबुस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर"


"हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती कुणीतरी ती डोलत होती..."

 या चित्रमयी कवितांच्या ओळी मुलांच्या ओठावर गोंदल्या कशा जाणार? आज चिमुरड्याच्या ओठांवर असते -

"दिल तो पागल है, दिल दिवाना है"
किंवा
"आती क्या खंडाला ?... पिती क्या कोका कोला?"

काळाबरोबर ज्ञानाचे, अनुभवाचे आणि अभिव्यक्तीचे क्षितिज रुंदावत जाते. जीवन जगण्याच्या रीती बदलत जातात आणि तसे व्हायलाच हवे. परंतु, वर्षाचे प्रवाह धावत राहिले तरी, एखादे पिंपळपान असे असते की, ते कालप्रवाहाच्या वर तरंगत राहाते. ताजेपणाने तरंगत राहाते. काळाच्या पल्याडचे चैतन्य त्यात नेहमीच रसरसलेले असते.
 ...पण त्या पिंपळपानावरच्या रेषा वाचायच्या कोणी ?

■ ■ ■

पिंपळपान /४७