रघुनाथप्रिय साधु उमदीस असतांना त्यांनी भाऊरानमहाराज
यांचें अंतःकरण निर्गुण उपासनेकडे कसें ओढून घेतले, त्यांस ते
निवरगीमहाराजाकडे कसे घेऊन गेले, व गुर्वाज्ञा झाल्याने स्वत:च
भाऊरावांवर कसा अनुग्रह केला ( पं. स. २-१७-२१), पुढें
भाऊरावांनी प्रपंच चालवून परमार्थ कसा साधला ( २१ - ३१ ),
लोकनिदेस कसें जुमानलें नाहीं ( ३१ ३९ ), कित्येक वर्षे, गुरूंवर
विश्वास ठेवून खडतर तप सें केलें ( ४०-४५ ), निंबरगीमहाराजचा
देहांत झाल्यावर प्रेमदुःखानें विव्हल होऊन दुप्पट जोरानें साधन
कसें चालविलें, व अद्वैतसिद्धिी कशी मिळविली ( ५०-५५), याचें
वर्णन पंचसमासी समास २ यामध्ये सापडेल. पूर्ण अद्वैतबोध
झाल्यावर केवळ लोकानुग्रह करण्याच्या इच्छेनें, गांवोगांवी हिडून
त्यांनीं भक्ति कशी वाढविली, व समुदाय वाढवीत असतां त्यांचें
वर्तन कसें असें याचें थोड़ें दिग्दर्शन त्याच समासांत (५५-७४)
ओव्यांत सांपडेल. त्यांचें वय हल्ली ६८ वर्षांचें आहे व त्यांस दोन
मुलगे आहेत. त्यांनी इंचगेरी या गांवीं ( तालुका इंडी, जिल्हा
विजापूर ) एक मठ स्थापिला आहे; व तेथें वर्षांतून तीन वेळेस
उत्सव होत असतो. चैत्र शुद्ध ९ ते १५ पर्यंत सप्ताह होतो; नंतर
सर्व श्रावणमासपर्यंत त्यांचे पुष्कळ शिष्य तेथें जमून साधन वाढ-
वितात; पुन:मार्गशीर्ष शुद्ध ९ ते १५ पर्यंत दुसरा सप्ताह होतो
त्या मठाचें व सप्ताहाचें वर्णन पंचसमासी समास ३ मध्ये आहे.
पान:नित्यनेमावली.pdf/१५
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९