पान:छन्दोरचना.djvu/377

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ३५० द्विपदी-द्विपदीचा सान्धा मात्र नीट जुळतो. ' ता-किति? 'बें-समू' यांच्या चारचारच मात्रा होतात आणि त्यामुळे ' ता' आणि * त्रं? यांच्यानन्तर चारचार मात्रांचा विराम घेतां येतो. कडव्याचा अन्त आणि ध्रुवपदाचा आरम्भ यांचाहि सान्धा जुळावा लागतो. चरणान्त्य लघु हा बहुश: गुरु होती; परन्तु कडव्याच्या अन्तीं येणारें लघु अक्षर पुढे धुवपदाशी जोडून घ्यावयाचें असतें म्हणून कित्येकदा लघुच झुचारावयाचें असतें.

  • प्रिया मी-नाक्षी निशि- दिनों सेवनीं । दक्ष, वचन मम । लक्षि धु० प्रिया० अिन्द्राचें सुख । तुच्छ मजपुढे । अमृत जरी तो । भक्षि? १ प्रिया०

(किग्र ५१६) परन्तु ध्रुवपद अ-भड्ग नसल्यास त्याचा अमुक ओकच भाग कडव्याला जोडून म्हटला पाहिजे असें नाही. ‘ ही। ओक आस मनिं। झुराल कनय्या। बजावू बजाबू मुर। ली go मी । अगदी भोळी । राधा तू । माधवजी नञ्च । साधा मो- हनी करी सुख- बाधा तुज । दासी विनवुनि । झुराल-” १ (गोवा ९९) येथे कडव्याच्या अन्तींची 'लि” -हस्व आहे कारण या चरणाला जोडून 'कनय्या । बजावू बजाव् मुर-| ली' हा ध्रुवपदाचा भाग म्हणावयाचा आहे. परन्तु हाच भाग म्हटला पाहिजे, अथवा धुवपदहि प्रत्येक कडव्याच्या अन्तीं म्हटलेंच पाहिजे असें नाही. किम्बहुना मुरलीसारख्या प्रदीर्घ कवितेंत पालुपदाचा कण्टाळाच येतो. अशा वेळीं कडव्याच्या अन्तीं काही मात्रांचा विराम येथुं शकल्याने “ ली? दीर्घ होते नि तशी आपोआप म्हटली जाते. ‘ चान्- दणें चहुकडे । खुललें फत्- तरहि सारे । फुलले