पान:छन्दोरचना.djvu/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इनच्या सौजन्याने ४७ काही छन्दोविषयक प्रश्न वाचकांच्या सोयीसाठी, त्यांचा रसहानि करणारा घोटाळा हो झुं नये म्हणून ओक दोन अटी पाळणे अवश्य आहे. प्रत्येक चरणांत आवर्तनांची सङ्ख्या ही अॅक ठराविक असावी. अन्त्य आवर्तनांत सोयीप्रमाणे शेवटीं केवळ खटका ठेवावा वा निरनिराळ्या मात्रांचे विराम घ्यावेत. चरणारम्भीं आवर्तनारम्भ न ठेवतां आद्यतालकपूर्व गण ठेवायचा झाल्यास तो सव चरणांच्या आरम्भ ठेवावा म्हणजे, चरणारम्भीं विविधता नसावी. चरणान्त्य विराम भिन्न भिन्न मात्रांचे असल्याने कण्टाळवाणे वाटणारें अॅकचओकपण तितकें झुणावेल. चरणान्त सारखे नसल्याने यमकाची अडचण हो औील; पण यमक काही पद्यास अपरि हार्य नाही * आज पौर्णिमा मुखचन्द्राची, माथ्यावर चान्दणे ढळल अटा मोत्याचे पाणी नीरस मग लेणे ! बहर भरारे देटोदेठीं रस भरला भरपूर तारुण्याची सरल सम्पदा, श्रुतरुनि जाअिल नूर.” (विवी ९) श्री. रा. बोबडे यांच्या या चार चरणांत तीन चरण भिन्न भिन्न मात्रावलींचे आहेत. ही रचना सयमक आहे; परन्तु अशा प्रकारची निर्यमक रचना केल्यास ज्यांच्या प्रतिभेची मुक्त पद्याच्या अभाव कुचम्बणा होत आहे अशा कवींची सोय हो औील आणि वाचकांचाहेि अगदी विरस होणार नाही ज्यांच्या प्रतिभेला कोणतेंहि बन्धन सहन होत नाही त्यांनी गद्याचीच योजना करावी. पद्यापासून होणारा श्रुत्यानन्द मिळणार नाही, पद्यामुळेच लागणारी ओक प्रकारची तन्द्री लागणार नाही; आणि वाचिताचें पुन्हा मनांतल्या मनांत रोमन्थ करूं म्हटलें तर तें तितकें साधणार नाही या सा-या गोष्टी ख-या. परन्तु भावार्थाच्या हृदयङ्गमतेमुळे होणारा आनन्द गद्यामुळे रतीमात्राहे झुणावत नाही झुलट गद्यापासून अॅक लाभच आहे. पद्याचा वेष करून जें अकाव्य काव्याच्या नावावर विकतें त्याचें खरें स्वरूप लोकांना चटकन् झुमगेल. तेव्हा स्वाभाविक झळझळीत गद्य धकेल, पण दिखाभू म्हणजे लयमुक्त पद्य रुचवणार नाही. लयमुक्त स्वैर पद्य हें निष्कारण कृत्रिम असल्याने केवळ स्वाभाविकपणाचा डाङ्गोरा पिटून तें कसें खपेल ?