Jump to content

पान:केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf/४३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 प्रत्यक्ष करून दाखवल्या जातात. त्याच्या योग्य दर्जाविषयी माहिती दिली जाते. किंमतीची कल्पना दिली जाते. बाजारपेठेविषयी सांगितलं जातं.

 या व्यतिरिक्त काही उद्योजकतेचे प्रबोधन करणारे मेळावे घेतले. त्याशिवाय काही प्रशिक्षणवर्ग असेही घेतले ज्यामध्ये भांडवलाची तरतूद याविषयी प्रशिक्षण दिलं जातं. बँकांची माहिती, बँकांच्या योजना, बँक व्यवस्थापकांशी चर्चा, वेगवेगळ्या सरकारी योजनांची माहिती, त्या योजना मिळवण्यासाठीची मदत अशा सर्वांगीण विचारांनी प्रशिक्षण वर्ग वेळोवेळी घेतले.

 बाजारपेठेची गरज मोठ्या प्रमाणावर -

 प्रशिक्षण, भांडवल, काम करण्याची तयारी या पाठबळावर माल तयार होण्यापर्यंतची साखळी व्यवस्थित पूर्ण होते. अनेकांना तर दर्जा राखणं, दर्जा तपासून पहाणं याचीही जाण असल्याचे दिसते, पण व्यवसायाची यशस्विता विक्री आणि नफा यावरच अवलंबून रहाते. तयार होणाऱ्या मालाला योग्य ती बाजारपेठ मिळणं या व्यवस्थेत काही कच्चा दुवा शिल्लक आहे. महिलांनी उत्पादन केलेल्या वस्तूंची प्रबोधिनीत व अन्यत्र स्टॉल मांडून गणपती, दिवाळी अशी प्रासंगिक विक्री केली जाते. तरी त्यापेक्षा अधिक प्रयत्न होण्याची, त्यात सातत्य असण्याची नितांत गरज आहे. त्यातूनच या छोट्या उद्योगांना स्थैर्य मिळेल.

 अनुभवातून उद्योगाच्या बारकाव्यांची जाणीव -

 गेल्या काही वर्षांच्या सातत्यानी झालेल्या या प्रयत्नातून लहान-मोठे पुष्कळ उद्योग उभे राहात आहे त्यातल्या काहींचा अनुभव घारे मामांसारखा दीर्घ आहे तर काहींचा नवा. या अनुभवांनी अनेक गोष्टी शिकवल्या आहेत.

 उद्योग करण्याची, त्यात टिकण्याची जिद्द तयार होते आहे. त्याबरोबर अनेक बारकावेही आत्मसात होत आहेत. उद्योगाची निवड कशी करावी, आपल्या भागात काय मिळत नाही, कुठला उद्योग चांगला चालेल याचा अंदाज घेणं, कच्चा माल विकत घेणं, त्यावर काही प्रक्रिया करणं याचे आडाखे आता बांधले जातात. याशिवाय वस्तू विकायची तर त्याचा दर्जा चांगला असला पाहिजे. सुबक, टिकाऊ पाहिजे याचं भान असल्याचं दिसतं. जास्तीत जास्त कुशलतेनी काम करण्याची गरज लोकांना जाणवते आहे.

 आवश्यक त्या ठिकाणी साहेबांना भेटणं, तहसीलदार, कार्यालय, बँक अशा ठिकाणी जाणं, योजना समजावून घेणं, त्याचे अर्ज भरणं ह्यात आता अतिशय अवघड, न जमणारं, आपल्या आवाक्याबाहेरचं असं काही वाटत नाही. वेल्ह्याच्या द्वारकाताई हे त्याचं चांगलं उदाहरण आहे. तर उज्ज्वलाताईंनी 'अमुकतमुक फॉर्म

एकमेकां साहा करू, अवघे धरू सुपंथ    ३८