Jump to content

पान:इत्ता..इत्ता..पाणी.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बी. डी. ओ. भाऊंनी सवाल केला.
 चाटे भाऊंनी पाजलेला चहा पिऊन.साऱ्याजणी मिळून मिसळून गावाकडे परतल्या.
 ही गोष्ट चार सालांखालची! आता सारेच बदलले. बायांचे महिला मंडळ जोरात काम करते. वनराई लावली आहे. जागोजाग पाणी अडवले आहे. विहिरीचे पाणी वाढलेय. यलडागाव नि कुरणवाडीला नळयोजना मंजूर झाली आहे. वैनगंगेत विहीर घेऊन ते पाणी डोंगरावर टाकीत साठविणार आहेत.
 हं, आणिक एक सांगायलाच हवे. हिराबाई आता गावची सरपंचीण आहे. हिरा पाय घसरून विहिरीत पडली. आणि गावची लाईनच बदलली.
 दर साली पाऊसकाळ येतो. गावची लहान पोरं-सोरं गाऊ लागतात.


... इत्ता इत्ता पानी
गोल गोल रानी
हिराबाईने केली किमया
गावात आलं पानी

१४