Jump to content

पान:आपले आभाळ पेलताना.pdf/८५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समोरच्या धरमशाळेच्या पुढ्यात पदर तोतोंडावर घेऊन पडून राहिली. दुसऱ्या दिवशी नळावर तोंड धुतले. गटा गटा पाणी प्याली. आणि परत कोर्टाच्या आवारापुढे थांबली. काल ज्यांनी तिला पाहिले होते त्यांना वेगळीच शंका आली असावी. ते नाव विचारायचे. गुपचुप नोट दिसेल अशी दाखवायचे. पण एक माणूस बरा भेटला आणि ती आमच्या संस्थेत दिलासा घरात आली.

..... दैवानं चहा पिऊन टाकला. मान खाली घालून म्हणाली, "ताई माझं चुकलं. एवढ्यावर माफी द्या. उद्यापासून मी शिवणक्लासला जाईन, समदं करीन."

 पण दैवाचं मन संस्थेच्या शिस्तीत रमलं नाही. तिला पाटी पेन्सील नकोशी वाटे. सकाळची प्रार्थना तर मुळीच आवडत नसे. "कशाला हवं परार्थना ! काय देतो देव ? आन आसतो तरी का ? असेल माजा हरी नि देईल खाटल्यावरी असं खेड्यातली मानसं म्हनतात. त्यांचा जीव 'हरी हरी' जपण्यात चाललाय. पण हरी देतो का सुख ? देतो आयती भाकर? कळतं तवापासून मी देवाला दंडवत घालते. काय दिलं त्याने मला ? घर की भाकर ?" ती विचारी.

 आमच्या दिलासा घरात आल्यापासून जीभ मात्र चांगली लवलवायला लागली होती. ओव्या छान म्हणत असे. माहेर संमेलनात धावण्यात पहिला नंबर पटकावला होता. पण दर दोनचार दिवसांनी झटका येई. मग आरडाओरडा कर, तर कुणाशी वचावचा भांडे. लहान लेकरांना - तेही दुसऱ्या बायांच्याच, भरपूर बदडून काढी. अद्वातद्वा शिव्या देई. असले चाळे चालत. शिवाणासाठी तर जात नसेच. एका सकाळी दिलासातून ती नाहीशी झाली. आम्ही पोलिसात कळवले. शोधाशोध केली पण तपास लागला नाही.

 दिवस जात होते. पण कधी कधी दैवाची आठवण येई नि मन खारे होई. आपण या पोरीच्या मनाला दिलासा देऊ शकलो नाही. तिची समजूत घालू शकलो नाही याची खंत मनाला बोचत राही. नवऱ्याने तर दुसरे लग्न केले होतो. बापाने गाव सोडून मुंबईचा रस्ता धरला होता.

 एक दिवस संस्थेतला ड्रायव्हर सांगत आला. "ताई परवा दैवा दिसली होती. पंजाबी डरेस होता अंगावर. मांजरसुंभ्याजवळच्या हॉटेलात

आपले आभाळ पेलताना/८३