निंबाळकर यांजकडे गेला, व त्याच्या आश्रयास राहून, आपल्या कर्तृत्वानें व परा-
क्रमानें त्या ठिकाणी त्यानें उत्तम लौकिक संपादन केला; तेव्हां जगपाळरावानें
आपली बहीण दिपाबाई हिच्याशीं मालोजीचा विवाह करून दिला; त्यानंतर
इ. सन १५७७ मध्ये जाधवरावानें मालोजीस मूर्तुजा निजामशाहा यांस भेट-
विलें, व बादशाहाजवळ त्याची मोठी शिफारस करून त्यास त्याने निजाम-
शाही सैन्यांत शिलेदारी देवविली; X यावरून मालोजी हा जगपाळराव निंबाळ-
कराकडे गेला होता, तरी त्यानें जाधवरावाचा आश्रय कायम ठेविला होता,
हैं उघड होतें.
नागपूरकर अप्पासाहेब भोसले, यांस जाऊन मिळण्याचा त्याचा बेत फसून
त्यास तसेच उत्तरेकडेस पळून जाणे भाग पडले.
x या बाबतीत वर दिलेल्या हकीकतीहून थोडीशी निराळी हकीकत उप-
लब्ध झाली आहे, ती अशी की,
शिखर सिंघणापूर येथे श्रीशंभू महादेवाचें एक जाज्वल्य साक्षात्कारी,
पुरातन व प्रसिद्ध देवस्थान आहे; यादव ऊर्फ जाधव घराण्यांतील राजा
सिंघण हा कोल्हापूरच्या राजाशी लढत असतो त्याचा मुक्काम साताव्याच्या
आसपास होता; त्यावेळी त्यानें खटाव तालुक्यांतील मायणी या गांवी दोन
ओढ्यांच्या संगमावर " संगमेश्वर " या नांवाचें एक महादेवाचें देवालय
बांधिलें, व भूषणगडचा किल्ला बांधून, श्रीशंभू महादेवाच्या देवालयाजवळ
सिंघणापूर हे गांव वसविलें; "सिंघणापूरचा महादेव" हे अनेक मराठा
कुळांचे आराध्य दैवत आहे; या ठिकाणी मालोजी व विठोजी हे उभयतां बंधू
आपल्या मातोश्री समावेत राहून श्रीशंभूमहादेवाची सेवा एकनिष्ठेनें करून
कालक्रमणा करीत होते; त्यावेळी त्यांना श्रीचा दृष्टांत झाला; त्यावरून हे
उभयतां बंधु फलटण येथें येऊन जगपाळराव निंबाळकर यांस भेटले, व
त्याच्या पदरी बाराशें होनांची तैनात मान्य करून इ० सन १५७७ या वर्षी
नौकरीस राहिले; हे उभयतांही बंधू मोठे शूर व साहसी असून, श्रीशंभू
महादेवाच्या एका जुन्या बखरीमध्ये त्यांच्या अलौकिक पराक्रमाचें साम वर्णन
केलेलें आहे; आणि त्यांत अतिशयोक्तीचा कांहीं भाग आहे, असे मानून तो
वजा केला तरी मालोजी व विठोजी हे उभयतां बंधू मोठे साहसी, शूर व