शिवाय प्रतिकाराला तयार होत नाहीत; दुःखें सहन करीत राहतात, पण
त्यांची प्रतिकाराची बुद्धि जागी होत नाहीं; परंतु स्वराज्य संस्थापनेच्या
कार्याला प्रारंभ करितांना तें कार्य शेकडा शंभर हिश्शांनी सिद्धीस
जाईल की नाहीं, याचा विचार करीत तो बसला नाहीं; यशाच्या
मोजमापावर आपल्या कर्तव्यनिष्ठेचें प्रमाण त्यानें ठरविले नाही. शहाजीचा
चुलत भाऊ खेळोजी याला अवरंगझेबानें ठार मारिलें, ही गोष्ट शिवाजीस
माहीत होती; त्यावेळीं ( इ० सन १७३९; आक्टोबर ) तो अजमार्से बारा
वर्षांचा होता; हुसेन निजामशाद्दा यानें आपला आजा लुकजी जाधवराव व
मामा अचलोजो यांना ठार मारिलें, ही गोष्ट शिवाजीस माहीत होती; त्या-
वेळीं ( इ० सन १६२९ मध्ये ) शिवाजी दोन वर्षांचा होता; शहाजीवरील
प्राणसंकटांची शिवाजीची आठवण ताजी होती; अशा रीतीने आपल्याच
नात्यांतील कर्त्या पुरुषांचे झालेले वध व वडिलांना भोगाव्या लागलेल्या
आपत्ति यामुळे, एखादा साधारण मनुष्य तर असले अचाट राष्ट्रकार्य अंगावर
घेण्याच्या भानगडींत, सर्व नाशाचा प्रसंग स्वतःवर आल्याशिवाय कधीच
पडला नसता; परंतु शिवाजी ही विभूती अत्यंत श्रेष्ठ दर्जाची होती;
स्वराज्य संस्थापना करण्याचें अलौकिक कार्य हाती घेणाऱ्या या विभूतीला
राष्ट्राच्या सर्व नाशाचाही प्रसंग उत्पन्न होण्याची जरुरी लागली नाही. राष्टाचा
सर्व नाश होईपर्यंत ही विभूती स्वस्त बसली नाहीं; तिला स्वस्थ बसवले
नाहीं. शिवाजीने स्वतः कष्ट सोसून व मार्गदर्शकत्व परकरून जनतेची प्रति
काराची बुद्धि जागृत केली. त्या बुद्धीला कायमपणा आणून, ती योग्य
नेतृत्वाखाली व नियंत्रणाखाली संघटितपणे उद्दिष्ट कार्यास लावून, उदरंभरण
हेच आपले ध्येय, व हीच आपल्या जन्माची इतिकर्तव्यता, अशा बुद्धीच्या
गुलामांच्या राष्ट्रांतील लोकांच्या भाकरीशी काळजी वाहण्याची जबाबदारी
आपल्या शिरावर घेऊन महाराष्ट्राचा संसार सुखाचा बनविला. स्वतःच्या
राजकीय उन्नती अठर्टी राज्यकर्त्यांच्या मेहेरबानांवर अवलंबून न राहता स्वतःचे
कर्तृत्व व लोकसंग्रहाचें पाठबळ, यांवर भिस्त ठेवून प्रयत्न केल्यास, व करीत
राहिल्यास राष्ट्राला आज नाहीं उद्यां, केव्हां तरी सुखाचे व स्वातंत्र्याचे
दिवस खास दिसतील, ही गोष्ट शिवाजीनें स्वतः पुढाकार घेऊन महाराष्ट्राच्या
.
पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२६७
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २५६ )