पावली. शहाजी राजे याची दुसरी स्त्री नामें तुकाबाई; ( संभाजी
मोहिते याची कन्या; ) प्रसिद्ध आदिलशाही सरदार बाजी मोहिते,
"अमीरराव " पोगरवाडीकर याची बहीण; लग्न इ० सन १६३०
मध्ये विजापूर येथे; तिचे पोटीं एक पुत्र; नामें एकोजी ऊर्फ व्यंकोजी
राजे; तंजावरच्या राज्याचा संस्थापक; शहाजीनें इ० सन १६३६
पर्यंत निरनिराळी प्रचंड कारस्थाने करून निजामशाही जगविण्याचा
प्रयत्न केला; व त्यानंतर ३० सन १६३८ मध्ये आदिलशाही नौक-
रीत दाखल झाला. इ० सन १६३८-१६४७ पर्यंत कर्नाटक प्रांतांत
त्याने आपले राजकीय महत्व, व आदिलशाही स्थापन केली ; इ० सन
१६४८ मध्ये त्यास बाजी घोरपडे यानें दग्याने पकडले, व विजापूर
येथे त्यास कारागृहवास घडला; इ० सन १६४९ मध्ये बंधमुक्तता
झाली; व कर्नाटकमध्ये परत गेला; व त्याच वर्षी आदिलशाहाच्या हुकु-
मानें विजापूर येथे येऊन, अजमासे चार वर्षे तेथे राहिला; व इ०
सन १६५३ मध्ये पुन्हां कर्नाटक प्रांती परत गेला; त्या वेळेपासून
इ० सन १६६१ पर्यंत कर्नाटक प्रांती मुक्काम; व विशेष महत्व
स्थापना; इ० सन १६६१ मध्ये, आदिलशाहाच्या आग्रहावरून, शिवा-
जीची भेट घेण्यास कर्नाटक प्रांतांतून निघून महाराष्ट्रांत आला; व
शिवाजीची भेट घेऊन, तो व आदिलशाहा यांच्यामध्ये तह घडवून
आणला; ( इ० सन १६६२ ). तो इ० सन १६६३ मध्यें, परत
जाण्यास निघून, पहिल्याने विजापूर येथे जाऊन, अली अदिलशाहास
भेटून कर्नाटक प्रांती परत गेला; याच वर्षी मार्च महिन्यामध्यें अल्ली
आदिलशाहा स्वतः कर्नाटकच्या मोहिमेवर जाण्याकरितां विजापूर येथून
निघाला; व तुंगभद्रा नदीस मिळणाऱ्या वर्धा नदांच्या कांठी त्याचा
तळ असतांना, त्याच्या " आपणांस ताबडतोब येऊन भेटा; या
हुकुमाप्रमाणे, शहाजी त्यास जलदीने प्रवास करीत येऊन भेटला;
तेव्हां बहलोल व शहाजी या उभयताही सरदारांना, त्याने ताबडतोब
पकडून त्यांना बेड्या घालून प्रतिबंधांत ठेविलें; ( इ० सन १६६३;
पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२१५
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २०४ )
[ वंशावळ पुढे चालूं]