पान:बालहक्क (Balhakk).pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रश्न १७आपल्या गावातील बालकांचे बालपण आनंदी, संरक्षित व सुखी होण्यासाठी काय कराल.
उत्तर :

१.बाल हक्क संरक्षण समिती सक्रीय राहील.
२.सक्रीय राहून काम करेल, नियमित बैठका होतील, समिती कागदावर नाही तर प्रत्यक्षात काम करेल.
३.गावस्तरावर ग्राम बाल संरक्षण कृती दल सातत्याने सक्रीय राहून बालक बालीकांच्या संदर्भानी घडणाऱ्या घटनांची नोंद घेऊन कारवाई करेल.
४.शाळा, अंगणवाडी, हायस्कूल, गावातील दुकानाच्या पानाच्या टपन्या मंदिरे ही ठिकाणे मुला-मुलींच्या वावरासाठी सुरक्षित आहेत याची काळजी घ्यावी, जिल्हा, तालुका, विभाग स्तरावरील गावातील प्रमुख पदाधिकारी या सर्वांचे मोबाईल नंबर संपर्क नंबर पत्ते कार्यालयाची ठिकाणी या सर्वा बाबतची माहिती ग्रामपंचायती मध्ये संरक्षण समिती कडे त्वरीत उपलब्ध झाली पाहिजे.
५.बालकांना तक्रार नोंदविण्यासाठी ग्रामपंचायतीत तक्रार बॉक्स ठेवावा, दर ३ महिन्यांनी तो उघडून तक्रारीचे निवारण करावे. ग्रामबल संरक्षण समिती ने गावातील विविध वयोगटातील बालकांच्या बरोबर माहिती देण्या घेण्यासाठी कार्यक्रम घ्यावेत बालकां संदर्भातील सर्व माहितीच्या बाबत गावात आकर्षक पध्दतीने माहितीचे बोर्ड लावण्यात यावेत. बाल संरक्षण समिती जागरुक आहे, कारवाई करते याची जाणीव पंचक्रोशीतील गावात झाल्यास बालकांच्या संदर्भात कोणीही विपरीत करण्यास धजावणार नाही.

६.बालकांच्या संदर्भाने कोणताही गुन्हा घडला असल्यास आणि कायदेशीर प्रकरण कोर्टात सुरु असल्यास त्या संदर्भातील साक्षीदारावर आरोपी कडून दबाव येणार नाही, बालकाच्या जीवीतास किंवा चारित्र्याला हानी पोहचणार नाही, त्याची गोपनियता सांभाळली जाईल त्यासाठी बाल हक्क समितीने नेहमी सक्रीय राहिले पाहिजे.

२०