या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५ )
'निबंधमाला' अस्तास गेल्यावर महाराष्ट्रांत जे मराठी वाङ्गय निर्माण झाले
त्याच्याशीं हरिभाऊ आपटे व कानिटकरदंपती यांचा बराच निकट संबंध आहे.
हरिभाऊ व कानिटकर यांचा ऋणानुबंध शेवटपर्यंत कायम होता. हल्लीं काशीताई
काशीक्षेत्री आपल्या ज्येष्ठ चिरंजीवाजवळ आहे. या आपला वेळ महाभारत-
सारखे ग्रन्थ वाचण्यांत, कहान मुलांसुदा शिकविण्यांत व इतर लेखनांत
घालवीत आहेत. त्यांचे हे पवित्र कार्य अखंड वालो, व महाराष्ट्रकुलवधूंना तें
सन्मार्गदर्शक व कल्याणप्रद होवो, अशी प्रदर्शित करून हा लेख आम्ही
संपवितो.
पुणे,
ता. २५ मार्च १९२१.
ता. २५ मार्च १९२१.
लक्ष्मणशास्त्री लेले,