पान:Yugant.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत



युगान्त / ६३


युगान्त / ६३ बसत (संजय). त्यांच्यातल्या सुरेख मुली ‘स्त्रीरत्नं दुष्कुलादपि' ह्या न्यायाने क्षत्रियांशी लग्न करू शकत (उदाहरणार्थ, सुदेष्णा), पण त्यांना क्षत्रियांच्या मुली लग्नाला मिळत नसत. दुर्योधनाने कर्णाला राजा बनवले, पण कर्णाशी संबंध केला नाही, हे लक्षात घेण्यासारखे आहे. दुर्योधन कर्णाला मित्र म्हणवीत असे, पण दोघांमध्ये संपूर्ण बरोबरीचे नाते नव्हते, सेव्यसेवकभाव शेवटपर्यंत दिसून येतो. तशीच अवस्था इतर सूतांची होती. विदुराचीही होती. विदुर आणि त्याचे भाऊ एका बापापासून झालेले; पण पहिल्या दोघांच्या आया क्षत्रियकन्या व मेलेल्या राजाच्या बायका होत्या. ह्याची आई दासी होती व मेलेल्या राजाची बायको नव्हती. तसे नसते, तर विदुर राजाच झाला असता, असे महाभारतात स्पष्टच सांगितले आहे. यादवांच्या भीषण अंतानंतर इंद्रपस्थ वज्राला मिळाले, हस्तिनापूर परीक्षिताला मिळाले. पण धृतराष्ट्रपुत्र असूनही सूत म्हणून बिचाऱ्या युयुत्सूला मात्र काहीच मिळाले नाही.
 ह्या वर्गाची अवस्था हीच होती. क्षत्रियांना अतिशय जवळचे, क्षत्रियांच्या रक्ताचे, क्षत्रियांना निर्भीडपणे उपदेश करू शकणारे असे हे लोक क्षत्रियांची बरोबरी मात्र करू शकत नव्हते. ते व त्यांची संतती सिंहासनावर बसू शकत नव्हती. धृतराष्ट्र आंधळा होता म्हणून त्याला राज्य मिळाले नाही. पांडू काही निर्व्यंग नव्हता. पण त्याला राज्य मिळाले. पण सर्व दृष्टींनी योग्य असूनही विदुर मात्र कोरडाच राहिला.
 सूतांची घरे राजांगणाच्या जवळच होती असे दिसते. विदुर काय, संजय काय आपापल्या घरी राजवाड्यापासून जरा दूर राहत होते असे दिसते. धृतराष्ट्राचे विदुरावर प्रेम होते. त्यातही एक प्रकारचा हुकमीपणा होता. वेळी-अवेळी गरज लागली, म्हणजे तो विदुराला बोलावणे पाठवी. त्याचप्रमाणे पांडवांकडे काही निरोप घेऊन वगैरे जावयाचे असले, तर विदुरालाच पाठवीत असे. एकदा रागारागाने त्याने विदुराला राजवाड्यातून घालवून दिले होते. पण