पान:Yugant.pdf/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

युगान्त / २५




दोन



गांधारी




१ -

 डोंगराळ प्रदेश संपून उत्तर-भारताचे न संपणारे, कंटाळवाणे, विस्तीर्ण मैदान लागले होते. मार्गातला अडथळा काय तो नद्यांचा, नाहीतर अधून-मधून लागणाऱ्या अरण्यांचा. कधी रथात बसून, मधूनमधून पायी, किंवा शिबिकेतून राजकन्येचा प्रवास चालला होता. तिच्याबरोबर सखी म्हणून तिच्यापेक्षा वयाने थोडी मोठी दासी होती. माहेर सोडताना राजकन्येची समजूत तिनेच घातली. नाना तऱ्हेच्या गोष्टी सांगून मार्गावरील रमणीय स्थळे दाखवून ती गांधारीचे चित्त प्रसन्न ठेवायचा प्रयत्न करीत होती. घरची माणसे नव्हती, पण राजपुत्र शकुनी बरोबर आला होता. तोही बहिणीची


 या लेखात आलेल्या गोष्टींपैकी फक्त खालील गोष्टी महाभारताच्या संशोधित आवृत्तीत आहे.
१. नवरा आंधळा म्हणून गांधारीने डोळे बांधले, २. गांधारीला खूप मुले झाली, व ती सगळी युद्धात मेली, ३. गांधारी, धृतराष्ट्र व कुंती वणव्यात मेली.
 या लेखात दाखवल्याप्रमाणे या तिघांच्या बरोबर न मरता विदुर महाभारतात त्यांच्या आधीच मेलेला आहे.