तो गेला तेथें तेथें त्यावर बंडावा होऊन (तेथील लोक) न्यास पळपुटा असें बोलू लागले. यानंतर हाशमोनायचे पुत्र पवित्र मंदिरांत आले, आणि त्यांनी मोडके दरवाजे बांधिले, भोकें बंद केली आ णि अगणित मुडद्यांनीं व अमंगळ पदार्थानी मंदिर विटाळ- लें होतें तें त्यांनी शुद्ध केलें. मग ( तेथील ) समई पेटवि- ण्याकरितां जाईताचें शुद्ध तेल ते शोधू लागले; परंतु त्यां- स एक कुपि मात्र सांपडली. तिजवर मुख्य याजकाची मोहर केलेली होती, यावरून तें शुद्ध होतें असें त्यांस वाटलें. त्यांत एक दिवस जळेल एवढेंच मात्र (तेल) हो- तें; परंतु आकाशाचा देव ज्यानें आपलें नाव तेथें ठेवि- लें होतें, त्यानें त्यास आशीर्वाद दिल्यावरून त्याकडून आठ दिवस दिवे लागले. यावरून हाशमोनायचा पुत्रांनी असा ठराव केला आणि आपणा बरोबर सर्व इस्राएलांवरहि असा दृढ नि- यम केला कीं, आकाशाचे देवानें दिल्हेला जय प्रगट क रण्या करितां शास्त्रांत लिहिलेल्या सना प्रमाणें हे आठ- दिवस आनंदाचे व हर्षाचे मानून त्यादिवशी दिवे लावा- वे. आणि ( या दिवसांत ) शोक करूंनये आणि उपा- स किंवा दुःख ठरवूनये; परंतु या गोष्टीमध्यें जें त्यांकरितां घडून आलें, त्यावरून त्यांनी आपल्या देवाची प्रार्थना करावी. परंतु हाशमोनाय व त्यांचे पुत्र व त्याचे बंधू यांनी, उद्योग करून काम करण्यास मना आहे असें का- ही ठरविलें नाहीं. या वेळेपासून यावानांचे राज्याची कीर्ति वाढली नाहीं. तेव्हांपासून देवाचे मंदिराचा नाश होईपर्यंत म्हणजे दोनशें सहा वर्षे हाशमोनायच्या पुत्रां-