पान:Paripurti.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८ । परिपूर्ती
 

ह्याउलट विधिपूर्वक सर्वांच्या समक्ष लग्नाची बायको आणली म्हणजे तिच्या पोराच्या मालकीसाठी बीजकर्तृत्वाची मुळी गरजच लागत नव्हती. एकदा स्त्रीवर मालकी सिद्ध झाली म्हणजे मग तिला कुवारपणी, विधवापणी, आपणापासून वा इतरांपासून होणा-या सर्व मुलांचे पितृत्व नवऱ्याकडे असे.
 त्या वेळच्या स्त्रियांची कोण ही अनुकंपनीय अवस्था! छे:! आपल्या हल्लीच्या कल्पना त्या काळावर लादणे योग्य नाही. स्त्रीला आपला दीर म्हणजे हक्काचा प्रियकर वाटत असे. दिराबद्दल तिचे विचार काय असतील याची कल्पना हल्लीच्या काही लोकगीतांवरून चांगली करता येते. पुढे-पुढे हे नाते नाहीसे होऊन फक्त निपुत्रिक विधवेलाच संतती निर्माण करण्यासाठी दिराशी संबंध ठेवायची परवानगी होती
 येथर्यंत माझे विचार कसे यंत्रासारखे चालले होते! पण एकदम मला कसली तरी आठवण झाली. कसल्या तरी दु:खद विचाराने माझे हृदय थरारले. मला परत महाभारतातल्या ओळी दिसू लागल्या. त्या प्राचीन काळी एका स्त्रीवर एक भयंकर अत्याचार झाला होता व त्याचे चित्रण इतक जिवंत, इतके विदारक होते की, आजही नुसत्या आठवणीने माझे मन कस जळत होते! हा अत्याचार काही आताच्या मध्यमवर्गीय नीतिकल्पनाचे स्तोम माजवून मी मनाला भासवून घेतलेला नव्हता. त्या वेळच्या कवीलाही तो तसा वाटला होता.
 मी ताडकन उठले. मैनेने विचारले, “बाई. काय झालं? काही नाही ते समोरचं लठ्ठ पुस्तक आणून दे." आदिपर्वातून तो भाग उघडून मा परत वाचला. म्हाताच्या शंतनूने आपल्या पराक्रमी मुलाच्या सुखाचा अथवा देऊन एका शीलभ्रष्ट सुंदर पोरीशी लग्न केले होते. ती सत्यवती. तिला " मुलगे झाले. एक लग्नाच्या आधी मेला. दुसऱ्यासाठी भीष्माने काशीराजाच्या मुली आणल्या. त्यातली मोठी अंबा. तिने स्वत:ला जाळून घेतले, व दुस-या दोघींचे शंतनुच्या धाकट्या मलाशी- विचित्रवीर्याशा लग्न- लागले. म्हातारपणाचा हा मलगाही संतती न होताच मेला. आता पुढे कुलक्षय होणार म्हणून सत्यवतीने, "भीष्मा, तु लग्न तरी कर, नारी भावजयीला संतती तरी निर्माण कर" म्हणन हट्ट धरला. त्या मानी राजपुत्राने ते ऐकले नाही. तेव्हा सत्यवतीने निर्लज्जपणे आपला कुवारपणाचा वृतान्त सागितला व आपल्या मुलाला-व्यासाला- बोलावण्याचा बेत सांगितला. भीष्माने ह्या बेताला मान डोलावली. ह्यापढचा कथाभाग असा आहे; ही दुष्ट