तिसऱ्या वर्षी व्याज ग मानले तर
- ग4840 = 110
- ∴ ग = 484
- ∴ तिसऱ्या वर्षा अखेर रास = 4840+ 484 = 5324
∴ तीन वर्षांच्या अखेरीस सुधाकरला 5324 रु. द्यावे लागले.
उदा. 2 स्वातीने 500 रुपये 2 वर्षासाठी द.सा.द.शे. 11 रु. दराने सरळ व्याजाने कर्जाऊ घेतले, तर ज्योतीने तेवढेच पैसे दोन वर्षांसाठी द.सा.द.शे. 10 रु. अशा चक्रवाढ व्याजाने घेतले. दोन वर्षाअखेर कर्ज फेडताना कुणाला जास्त पैसे द्यावे लागले? किती?
स्वातीने सरळ व्याजाने कर्ज घेतले- 100 रु. वर 2 वर्षात 22 रु. व्याज सरळव्याजाप्रमाणे होते.
∴ 500 रु. वर 2 वर्षात 22x5 = 110 रु. व्याज होते.
- ∴ रास 500 + 110 = 610 रु. झाली.
ज्योतीला पहिल्या वर्षी 5x10 = 50 रु. व्याज झाले.
दुसऱ्या वर्षासाठी 500 + 50 = 550 रु. मुद्दल धरायचे.
100 रु. वर 10 रु. व्याज व 550 रु. वर व व्याज मानूं
∴व550 = 10100
∴व = 55010 = 55
∴ज्योतीला दुसऱ्या वर्षा अखेरीस 550+55 = 605 रु. रास द्यावी लागली.
∴स्वातीने 610-605 = 5 रु. जास्त दिले.
सरावासाठी पुढील उदाहरणे सोडवा.
(1) 400 रु. कर्जावर द.सा.द.शे. 12 रु. प्रमाणे 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज कित्ती होईल?