पान:Ganitachya sopya wata.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



गुणोत्तर प्रमाण

हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक प्रकारची गणिते या एका पद्धतीने सोडवता येतात. तेव्हा ही पद्धत नीट शिकून घ्या. सोपी आहे, मात्र या पद्धतीने भरपूर गणिते सोडवून सराव करा. तुम्हाला हे माहीत आहेच की सगळ्या मुलांना सारख्या प्रमाणात किंवा समप्रमाणात पेढे वाटायचे असतील तर जेवढी जास्त मुलं असतील त्याच प्रमाणात पेढे लागतील. समजा प्रत्येक मुलाला दोन पेढे द्यायचे आहेत तर आठ मुलांना आठ दुणे 16 पेढे लागतील. नऊ मुलं असतील तर नऊ दुणे अठरा पेढे हवेत. 32 मुलं असली तर 32 x 2 = 64 पेढे हवेत. खरं ना ? आता हे गणित समप्रमाणाचे आहे कारण जशी मुलं बाढतील, तसे पेढे वाढणार व मुलं कमी झाली की पेढे कमी लागणार. म्हणजे अशा प्रकारच्या गणितात मुलं व पेढे समप्रमाणात असतात, किंवा मुलांची संख्या/पेढ्यांची संख्या हा अपूर्णांक, म्हणजेच मुलं व पेढे यांचे गुणोत्तर प्रमाण कायम असतं. या ठिकाणी हे गुणोत्तर प्रमाण मुलांची संख्या/पेढ्यांची संख्या = असे आहे. एका मुलाला दोन पेढे हे प्रमाण ठरलेलं आहे - म्हणजेच मुलं व पेढे यांचे गुणोत्तर प्रमाण असं आहे.

कितीही मुलं असली तरी हे प्रमाण किंवा हा अपूर्णांक बदलत नाही. कारण कुठल्याही अपूर्णांकात अंश व छेद दोघांनाही एकाच संख्येने गुणलं किंवा भागलं तर अपूर्णांकाची किंमत बदलत नाहीहे ध्यानात असू द्या. म्हणूनच मधे अंश व छेद दोघांनाही 8 ने भागलं किंवा मधे अंश व छेद दोघांनाही 9 ने भागलं तर हाच अपूर्णांक येतो. उलट या अपूर्णांकाच्या

गुणोत्तर प्रमाण
१९